मराठी सदर



जागतिक स्वमग्नता जागृती दिननिमित्त 'माय  डीयर यश' चा खेळ  

मुका-बहिरा नायक आणि ऑटिस्टिक नायिका यांची गोष्ट सांगणारा अगदी अलीकडचा गाजलेला 'बर्फी' असो की मुक्या-बहिऱ्या जोडप्याचे सहजीवन दाखविणारा 'कोशिश' असो किंवा राष्ट्रीय सुवर्णकमळ विजेता 'श्वास' असो विविध विकार तसेच अपंगत्व, आजार याविषयी जनमानसामध्ये प्रभावी पद्धतीने जनजागृती चित्रपटांद्वारे होते. डिस्लेक्सिया या आजाराबद्दल लोकांना फारशी माहिती नव्हती. परंतु, अमोल गुप्ते-आमिर खान-दर्शिल सफारी यांच्या गाजलेल्या 'तारे जमीं पर'मुळे असा काही आजार असतो आणि तो पूर्णपणे बरा होऊ शकतो याची जाणीव लोकांना झाली. प्रियांका चोप्राने अप्रतिम साकारलेल्या 'झिलमिल' या बर्फीमधील व्यक्तिरेखेदरे ऑटिझमविषयक माहिती लोकांना प्रभावी पद्धतीने मिळाली. आता स्वमग्नता या विषयावर शेखर सरतांडेल यांनी 'माय डिअर यश' हा चित्रपट दिग्दर्शित केला असून त्याचा विशेष विनामूल्य खेळ मंगळवारी वर्ल्ड ऑटिझम डेनिमित्त रवींद्र नाटय़ मंदिर संकुलातील मिनी थिएटरमध्ये संध्याकाळी ६.३० वाजता दाखविण्यात येणार आहे.
२ एप्रिल हा जागतिक 'स्वमग्नता दिन' (वर्ल्ड ऑटिझम डे) म्हणून पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने १९८९ सालापासून हा दिवस जाहीर केला आहे. ऑटिझम किंवा स्वमग्नता म्हणजे स्वत:तच रमून राहण्याची तीव्र स्वाभाविक वृत्ती. विशेषत: लहान मुलांमध्ये वाढत्या वयात दिसून येणारी ही वृत्ती म्हणजे आजार नसून कमीअधिक प्रमाणात त्रास देणारी समस्या ठरते. या समस्येची जाणीव पालकांना करून देण्यासाठी चित्रपट या उत्तम माध्यमाचा उपयोग दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांनी 'माय डिअर यश' हा चित्रपट तयार केला आहे. अथर्व बेडेकर या बालकलाकाराने यात मुख्य भूमिका साकारली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने 'माय डिअर यश'च्या विशेष खेळाचे आयोजन केले असून या वेळी या चित्रपटातील लोकेश गुप्ते, सुखदा यश, प्रदीप वेलणकर, विभव बोरकर, उमेश कामत तसेच डॉ. अच्युत गोडबोले आदी उपस्थित राहणार आहेत. चित्रपटाबरोबरच स्वमग्नता या विषयावर चर्चा केली जाणार आहे.

एप्रिल 2013 , लोकसत्ता 




ऑटिस्टिक मुलांच्या पालकांचे दु:ख

ज्योती फडके
९८२२५७१६१९

काही दिवसांपूर्वी सकाळी पेपर उघडला आणि बातमी वाचून अक्षरश: धक्का बसला. एका ऑटिस्टीक मुलाच्या आईने आपल्या मुलासकट फुटाळा तलावात जीव दिला. असंख्य ऑटिझमग्रस्तांचे पालक या बातमीने हादरले. इतकं पराकोटीचं दु:ख त्या आईला कशामुळे झालं असेल की तिने आपल्या लहान मुलीचा विचारसुद्धा करू नये. माझ्या नंतर माझ्या लहान ३ वर्षांच्या मुलीचं काय होईल? हा साधा विचारही तिच्या मनात आला नाही. ऑटिझम हा काही रोग नाही तर ती एक ब्रेन डिसऑर्डरची कंडिशन आहे. तुम्ही आम्ही मिळूनच एक समाज तयार होत असतो. ऑटिझमग्रस्त मुलं-मुली अगदी सामान्य मुलांसारख्या खेळकर किंवा योगदान देणाऱ्या नसल्या तरी ते आपले आहेत. त्यांच्या वागण्याला समजून घेत फार महत्त्व आहे ती ज्या प्रकारे वागताहेत त्या कृतीमागे त्यांचा कोणताही विचित्र हेतू नसून त्यांच्यातल्या उपजत उणिवेमुळे ते वर्तन प्रेरित झालेले आहे, हे समजून स्वीकारले पाहिजे. आत्महत्या किंवा डिव्होर्स हा समस्येवरील अंतिम तोडगा नाही.

ऑटिस्टीक मुलांचे संगोपन व पालन करणे ही साधारण गोष्ट नाही. अशा मुलांच्या पालकांना त्यांचे संगोपन करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. घरातील वातावरणाचा या मुलांच्या प्रगतीवर खूप परिणाम होत असतो. प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलाची काळजी ही वाटतच असते. त्याला कशा प्रकारे शिक्षण द्यावे? त्याला स्वत:च्या पायावर उभं राहता येईल का? समाजाकडून चांगली वागणूक मिळेल का? आपल्यानंतर त्याना कोण व कसे सांभाळणार, असे अनंत प्रश्न पालकांसमोर असतात. या मुलांना सामान्य मुलांबरोबर प्रशिक्षण देणे अवघड असते. प्रत्येक मुलाला कोणतेही काम सारखेच जमेल असे नाही. प्रत्येकाची आकलन शक्ती, क्षमता, कामाची गती ही सारखीच नसते.

आदित्यच्या आईच्या मनात हेच सर्व विचार आले असतील. आपण हे सर्व करायला असमर्थ आहोत किंवा पुढच्या अनेक अडचणीचे बघून घाबरायला झाले असेल. अजून तरी समाजात ऑटिझमबद्दल अवेअरनेस आला नाही. कित्येक लोकांना ऑटिझम म्हणजे काय असतं? याची अजून जाणीवच नाही. त्यामुळे समाजाकडून या मुलांची (पालकांची) अवहेलना होताना आढळते. त्यांच्याकडे बघताना विचित्र दृष्टीने बघितले जाते. आमच्या शाळेत अशी अनेक मुले आहेत ज्यांचे पालक सांगतात गाडीवरून, स्कूटर, स्कुटीवरून जाताना बऱ्याच वेळेला मुले सिग्नलला गाडी थांबल्यावर उतरून चालायला लागतात. आईची अवस्था अशी असते की गाडी स्टॅन्डला लावू की मुलाला पकडून बऱ्याच वेळेला पोलीस किंवा जाणारा येणारा मुलाला पकडून आणून देतो आणि विचित्र दृष्टीने बघायला लागतो, नवीन व्यक्तीला काय माहीत मुलगा असं का वागतं! मुलगा गाडीवरून उतरून चालायला लागतो म्हणून ओढणीशी स्वत:ला बांधून आणावं तर मुलगा जोराजोरात ओरडायला लागतो. बचाव.. बचाव..जेणेकरून आजूबाजूनी जाणारे लोक विचित्रपणे पाहतात. एका मुलाची आई या अनुभवावर सांगत होती की, मी एक मुलं पळवणारी बाई आहे असं माझ्याकडे लोक बघत होते, पण काय करणार? मुलाला तर शाळेत सोडायचं असतं.

चोवीस तास मुलाला सांभाळून आई अगदी थकून जाते. मुलाला दिवसभर 'बिझी' ठेवलं नाहीतर मुलं दिवसभर पळापळ करून घर डोक्यावर घेतात. मुलालाही सांभाळणे आणि घरातील कामेही करणे असा सर्व भार आईवर आलेला असतो. यासाठी घरातील सर्वानी तिला जास्तीतजास्त सपोर्ट करावा. घरातील तसेच बाहेरचे जे जे लोक तिच्या संपर्कात येतील त्यांनी वेळोवेळी आधार देणे आवश्यक आहे. ऑटिझमच्या मुलांना वाढवताना फार मोठा पेशन्स लागतो. डोकं शांत ठेवून मुलाला शिकवावं लागतं. ही मुले दिसायला एकदम सुंदर आणि नॉर्मल दिसतात; परंतु नजरेला नजर देत नाहीत. ही मुलं वेगळी जाणवतात ती केवळ वयाच्या वर्तणुकीमुळे त्यांना नजरेला नजर देऊन संवाद साधण्यात अडचण येते. विशेष हे की, ऑटिझमचं सरसकट निदान, तुम्ही करू शकत नाही.

प्रत्येक ऑटिझमची लक्षणे असलेल्या मुलाचा स्वत:चा एक पॅटर्न असतो; परंतु तीन क्षेत्रात यांच्या मेंदूची कार्यकुशलता कमी आहे हे जाणवतं.

१. कम्युनिकेशन- संवाद साधन २. सोशल स्कील्स- चार चौघात वावरायचं भान ३. इमॅजिनेशन- कल्पना शक्ती.

ऑटिझमच्या डिग्रीज असतात त्या त्या प्रकारच्या मुलामुलींना तशा प्रकारचं शिक्षण मिळालं तर त्यांच्या कुवतीनुसार विकास होतो. लोक हा विषय गांभीर्याने कळावा म्हणून जागृती निर्माण होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. आदित्यच्या आईसारखा विचार कुठल्याही आईने कधीही मनात आणू नये. अडचणींवर मात करता आलीच पाहिजे. या अडचणींवर मात न करणे म्हणजे हार मानणे. यासाठी समुपदेशनाची सोय आहे. आमच्या शाळेत पालकांसाठी समुपदेशनाची सोय आम्ही विनामुल्य देतो. पालकांना आपल्या ताणांना, आपल्या विचारांना मोकळी वाट मिळते, मन शांत होते.

समुपदेशक या नात्याने काही विचार नोंदवावेसे वाटतात. सर्वप्रथम ताण हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. याचा स्वीकार करावा. ताणाची जीवनात उपयुक्तता आहे हे मान्य करावे. एखादे तंतूवाद्य असलेल्या सतारीच्या तारा ताणलेल्या असतात म्हणूनच त्यातून सुंदर सूर निघतात. ताणामुळे आपल्या अनेक क्षमता आपण जाणू लागतो. हा सकारात्मक दृष्टिकोन ताण हाताळताना बाळगणे खूप उपयुक्त ठरते. बाह्य़ मागण्या व अंतर्गत क्षमता यांचे असंतुलन शरीर व मनावर परिणाम करते. तो ताण तसेच आपल्या अपेक्षा व वास्तव यामधील तफावत ताण निर्माण करते. यामुळे समुपदेशक आपल्या शुभार्थीला त्याच्या ताणांची कारणे नेमकेपणाने लिहायला लावणे ही पहिली पायरी मानतात. हे परमेश्वरा, जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे सामथ्र्य मला दे. जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्याचे धैर्य मला दे आणि त्या दोन्हीतला फरक मानण्याचे शहाणपण मला दे.

आता शुभार्थीला (काऊन्सेली) त्याने लिहून काढलेल्या कारणांपैकी तो काय करू शकतो त्याकडे त्याचे लक्ष वळवले जाते. यामुळे सातत्याने व सर्वच ताणांसाठी बाह्य़ परिस्थिती वा व्यक्तींना दोष देण्याऐवजी स्वत: काही जबाबदारी घेण्याची त्याची मानसिकता तयार होते. मुळात जीवनातले ताण, व्यक्ती-व्यक्तीमधील बेबनाव, नात्यामधील संघर्ष जबाबदारी न घेण्याची व झटकण्याची वृत्ती या सर्वाना समर्थपणे हाताळण्यासाठी एका त्रयस्थ व्यक्तिमत्वाची, मताची, भूमिकेची गरज असते. समस्या सोडवण्याची क्षमता प्रत्येकातच असते. त्याची फक्त त्याला जाणीव करून देणे, विविध पर्याय स्वत:चा निवण्यास मदत करणे हे साक्षीभावाने केवळ बोट धरून करतो तो समुपदेशक. या पलीकडे जाऊन एक महत्त्वाचा विचार मांडावासा वाटतो. बाह्य़ परिस्थिती कशीही असो आपल्या आसपासच्या व्यक्तीच्या कृती वा बोलणे काहीही असेल; परंतु आपण त्या क्षणी कोणती प्रतिक्रिया देतो, कोणता प्रतिसाद देतो व ती परिस्थिती कशी हाताळतो यावर आपले मन:स्वास्थ्य ताणाचे स्वरूप, तीव्रता अवलंबून असते.

त्यासाठी जास्तीत जास्त आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. नव्या आव्हानांना तोंड देण्यास सज्ज राहणे. त्यासाठी योगशास्त्र प्राणायाम, ध्यान या सारख्या उपायांची जोड देणे. त्याचबरोबर पाश्चात्य प्रणालीमधील Self help म्हणजे स्वमदत तंत्रेही आवर्जून वापरली जातात. प्रत्येक व्यक्तीने स्वत:चेच समुपदेशक बनणे गरजेचे आहे. आदित्यच्या आईनी या सर्व उपायांचा विचार केला असता किंवा सकारात्मक भावना ठेवून आदित्यला वाढवले असते तर काही जगमान्यांमध्ये तिची गणना होऊ शकली असती.

काही स्त्रियांनी आपल्या ऑटिझमग्रस्त मुलांना इतकं उत्तम तयार केलं की, आज टेम्पंल गेरार नावाची मुलगी एका मोठय़ा कंपनीत एक व्यावसायिक म्हणून काम करते आहे. आपल्या non verbal मुलासाठी soma.org नावाची संस्थापिका अमेरिकेत मुलांसाठी शाळा चालवते आहे त्याचप्रमाणे special educater साठी teaching (Diploma and certificate) कोर्सेस चालवणे आहे. मुलाला इतका छान trained केलं आहे की तो स्वत: कविता करतो. कुठल्याही कामात हार न मानता जास्तीत जास्त काम करून आपल्या समाजाला तसेच आपल्या मुलांना जास्त जास्त पुढे नेण्याचा प्रयत्न आपण सगळेच करू शकतो. लेखिका 'संवेदना' ऑटिझमग्रस्त मुलांची शाळा चालवतात.



 




अंधांच्या प्रवासाला वाहकांची 'बेस्ट'दृष्टी!

'बेस्ट'ने प्रवास करणाऱ्या अंध प्रवाशांचा प्रवास सुलभ होण्यासाठी आणि अंधाना कोणत्या प्रकारचा त्रास होत असेल ते जाणून घेण्यासाठी 'बेस्ट'चे चालक आणि वाहक गेल्या काही महिन्यांपासून दर मंगळवारी डोळ्याला पट्टी बांधून आणि हातात काठी घेऊन बसमध्ये चढत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून 'बेस्ट' आणि 'नॅब' (नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड) यांच्या संयुक्त विद्यमाने दर मंगळवारी ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.

अंधांना बसमध्ये चढताना आणि उतरताना खूप कष्ट पडतात. बसण्यासाठी आसन आरक्षित असले तरी आपल्या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी अंधांना गर्दीतून वाट काढणे कठीण जाते. अशा वेळेस मदतीला येतात ते 'बेस्ट'बसमधील वाहक. त्यांच्यासाठीच हे प्रशिक्षण दिले जात आहे.

बसमध्ये चढताना अंधांना हात देणे, तिकिट देण्याच्या गडबडीतही त्यांना त्यांच्या आसनावर नेऊन बसवणे, तिकिट काढून देणे, सुट्टय़ा पैशांबद्दल समजवून सांगणे, त्यांचा थांबा येण्यापूर्वी त्यांना दरवाज्यापर्यंत घेऊन जाणे आणि व्यवस्थित उतरवणे ही सगळी कामे कशी करावी त्याचे प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात येत आहे.

कार्यशाळेत वाहकांच्या डोळ्यांना पट्टी बांधत असल्यामुळे अंधांच्या अडचणी त्यांना अनुभवता येतात. अंधासाठीच्या ह्या प्रशिक्षणाला चालक आणि वाहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे व ते आवडीने ह्या प्रशिक्षणाला हजेरी लावत असल्याचे कार्यशाळेत प्रशिक्षण देणारे शैलेश कदम यांनी सांगितले.

३१ मे २०११, मुंबई वृत्तान्त



 




आज माझ्या वेदनेला अर्थ नवा येत आहे........

मला जाग आली तेव्हा हॉस्पिटलमधली आया मला विचारात होती - तुम्हाला नेहमी असं होत का? मी गोंधळून विचारलं - असं म्हणजे कसं? अगं बया? तुम्हाला कळलंच नाही का? डिलिव्हरी टेबलवर फिट आली तुम्हाला. बेशुद्ध झालात , जीभ बाळंतपण सुखरूप पार पडलं. बेबी छान आहे हो तुमची. ह्या शब्दात मी 'आई' झाल्याच मला कळलं. जीभ चरचरीत का लागत होती त्याचाही अर्थ लागला. पण हे 'फिट' प्रकरण काय आहे ते मात्र कळलं नाही. आयाने मी शुद्धीवर आल्याच एव्हाना बाहेर कळवलं असावं. ताटकळत थांबवलेल्या घरच्यांना आत सोडलं गेल. पण त्यांनीही ' काही झालं नाही तुला '. आता शांत झोप बघू. जास्त विचार करू नकोस असं काहीबाही सांगून वेळ मारून नेली. कधी एकदा मुलीचं तोंड बघते असं झालं होत. त्या घाईत मीही दुर्लक्ष केल. नंतरची चार वर्ष उपडी, रांगली, दुडूदुडू धावली, तिचाकी, दुचाकी सायकलवर तोल सावरत कशी गेली कळलंचं नाही.

आई - वडील कलाप्रेमी, संगीत- नाटकाची उत्तम जाण असलेले. त्यांनी लहानपणापासून उत्तेजन दिल्यामुळे मी वेगवेगळ्या कार्यक्रमातून, गणपती उत्सवांमध्ये गाणी म्हणायची, नाटकातून काम करायची. माझा नवरा आणि मी एकाच कॉलनीत राहयचो आणि नाटकात काम करता - करता एकत्र आलो. पुढं आम्ही लग्न केलं. त्यामुळे लग्नानंतरही हौस म्हणून नाटक चालूच राहिली. नंतर रिझर्व बँकेत नोकरी लागली. तिथंही हिंदी दिवस, स्पर्धा इ. मधून भाग घायचे. मुलीच्या जन्मानंतरही नाटकातून काम करणं चालूच होत. एके वर्षी मी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेतला होता. मी Men Without Shadow या नाटकाची rehearsal करत होते. त्या दिवशी खर तर मला सकाळपासूनचं काहीतरी वेगळ वाटत होत. पण शारीरिक त्रास काहीच होत नव्हता. त्यातून मी एकाच स्त्री पत्र, महत्वाचा रोल , स्पर्धा दोन दिवसांवर आलेली त्यामुळे मला तालीम करण अपरिहार्य होत आणि.... मला फिट आली. पहिल्या वेळेप्रमाणेचं याही वेळेला मला काही कळलं नाही. मी बराच वेळ शुद्धीवर नसावी पण जेव्हा मला अर्धवट शुद्ध आली तेव्हा जाणवलं मी एका क्लिनिकमध्ये आहे आणि एका अनोळखी डॉक्टर माझ्याशी बोलत आहेत - पहिल्या वेळेलाही तुम्हाला असाच त्रास झाला असेल तर या वेळेला गरोदरपणात नीट काळजी घ्या.

तालमीच्या वेळेला आलेली फिट ओसरल्यावर दुस-याच दिवशी बर वाटल होत. नाटक करून पटकावल होत. त्यामुळे आत्मविश्वास वाढला होता. घरात सगळ कस मनासारखं घडल होत. आनंदाच पारड नेहमीच जड होत. गद्धेपंचविशी, त्यामुळे आलेल्या दोन्ही फिट्स सोयीस्कररीत्या Pregnancy related चं असाव्यात असं समजलं. यथावकाश काही अडचण न येता मला मुलगा झाला. चौकोन पूर्ण झाल्याच्या आनंदात आम्ही मशगुल होतो. घरी सासू - सासरे, जवळच आई - वडील त्यामुळे चांगल्या नाटकाची, गाण्याची कार्यक्रमाची संधी आल्यास मुलांना, तालमीच्या वेळेला आलेली फिट ओसरल्यावर दुस-याच दिवशी बर वाटल होत. नाटक करून पटकावल होत. त्यामुळ आत्मविश्वास वाढला होता. घरात सगळ कस मनासारखं घडल होत. आनंदाच पारड नेहमीच जड होत. गद्धेपंचविशी, त्यामुळे आलेल्या दोन्ही फिट्स सोयीस्कररीत्या Pregnancy related चं असाव्यात असं समजलं. यथावकाश काही अडचण न येता मला मुलगा झाला. चौकोन पूर्ण झाल्याच्या आनंदात आम्ही मशगुल होतो. घरी सासू - सासरे, जवळच आई - वडील त्यामुळे चांगल्या नाटकाची, गाण्याची कार्यक्रमाची संधी आल्यास मुलांना, आजी - आजोबांचा choice असायचा अर्थात त्यांच्या सोबत नवरा असायचा. त्याचेही छंद बरेच होते. आम्ही दोघेही नोकरी सांभाळून आपापली आवड जोपासण्याचा प्रयन्त करत होतो जिथ शक्य असेल तिथ मुलांना घेउन जायचो. दिवस असे मजेत चालले होते.

बी.ए. च्या पदवीसाठी मी 'मानसशास्त्र' हा विषय निवडला होता. बा लमानसशास्त्रमध्ये वाचलेल आठवत होत की बाळच्या जन्मापूर्वी, जन्मताना, तसेच जन्मल्यानंतरच्या नजीकच्या काळात काही अड़चणी आल्या किंवा बाळच्या डोक्यात ताप वैगरे चढला तर त्याच्या विकासात काही अडचणी येऊ शकतात त्यामुळ दोघेही मुलांच्या वाढीकड़े, प्रगतीकडे मी बारीक़ लक्ष ठेउन होते. मुलीची - प्रीतिची प्रगति व्यवस्थित होती. घरामध्ये, शाळेत, इतरांबरोबर मिसळताना लक्षात येत होत की तिला Birth Trauma झाला नसावा. तिच्याबबत्त मी निश्चित होते. ती चुणचुणीत आणि बोलघेवडी होती. धाकटा मुलागा रोहन, अजून निटसा बोलत नव्हता. पाचही बोट काही सारखी नसतात हे कितीही घोकल, दोघांची तुलना करायची नाही. अस ठरवल तरी माझ मन पारखून नक्कीच बघायच आणि मग वाटायच की धाकटयाच्या बाबतीत काहीतरी वेगळ आहे खर पण काय ते नक्की कळायच नाही. घरातली मोठी, जाणती माणस समजूत घालायची -' मुलगा आहे ना, तो उशीरच बोलेल' , वगैरे . बरोबरीच्या मुलांबरोबर मिसळला तर कदाचित लवकर बोलायला लागेल म्हणून त्याला जवळच्याच 'प्ले स्कूल' मध्ये दाखल केल. माझा भाचा त्याच शाळेत जायचा आणि माझा मुलगा त्याला सतत चिटकून असायचा. बोलण्यात फार काही प्रगती झाली नाही पण बाकी मुलांमध्ये थोडेफार मिसळायला लागला. तरीही मनात पाल चुकचुकत राहिली.

मला अस्वस्थ व्हायला आणखी एक कारण होत. दर दिवशी ऑफिसमधून आले कि मी खालूनच मुलाला हक मारायची. सासू- सासरे दोघेही वयस्कर त्यामुळे प्ले स्कुलानंतर तो माझ्या आईकडे असायचा. माझी आई, भाऊ - वाहिनी माझ्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहतात. मी हाक मारली कि माझा भाचा 'ओ' द्यायचा आणि सांगायचा कि रोहन इकडेच खेळतोय. मला वाटायचं कि रोहन कशाला 'ओ' देत नाही? त्याला ऐकू येत नाही का? वर जाऊन बघितलं तर हा आपल्याच तंद्रीत खेळत असायचा. एकदा असंच, हा कुठच दिसेना. आम्ही दोघांनी कॉलनीभर शोधलं. हाक मारून मारून थकलो. त्याच्या मित्रमंडळीकडे चकरा मारल्या. कुठचं दिसेना, शेवटी एका कारच्या मागे मातीत मस्त खेळत बसलेला आढळला. त्याला कशाचा पत्ताच नव्हता. माझ्या पोटात धस्स झालं. डॉक्टररांना शंका सांगितली तर तपासणी करायचे, म्हणायचे- ऐकू येतंय, कमी बोलतोय पण बोलतोय ना. प्रोब्लेम काही वाटत नाही.

कॉलनीतली बरीच मुल- त्यातली काही माझ्याच मुलांबरोबरची किंग जॉर्जमध्ये जाणारी. शाळेचा वेळ ११ ते ५ म्हणजे मला नोकरी करणा-या बाईला सोईची, मध्यवर्गीय संस्कार अशा सर्व गोष्टी लक्षात घेता मी रोहनला प्ले स्कूलनंतर दादर - हिंदू कॉलोनीतल्या लीन जॉर्ज आत्ताची व्ही. एन. सुळे गुरुजी विद्यालयमध्ये घातलं. मिनी के. जी. फारसं काही न घडता पार पडल. शिकेल हळू- हळू, फारच बुवा शंकेखोर स्वभाव असं मी माझ्याच मनाला नावं ठेवली. आणि रोहनच्या ज्युनियर के.जी. ची सुरुवात झाली.

एका रविवार मी जवळच एका मैत्रीणिकडे गेले होते आणि अचानक मला त्या नाटकाच्या तालीमिच्या वेळेला कस वेगळ वाटल आणि मला क्षणार्धात लक्षात आल. आता आपल्याला फिट येणार आणि शुध्द हरपणार. मी ताबडतोब मैत्रिणिला कल्पना दिली आणि तिकडेच दहा मिनिट झोपले, थोड्या वेळान बर वाटल. उठून घरी आले, घरातली काम उरकायला लागले. मुलाला गोष्ट सांगत भरवत होते आणि..... मला मोठी फिट आली. घरात तेव्हा आठ वर्षाची माझी मुलगी, आणि मांडीवर बसलेला चार वर्षाचा मुलगा याशिवाय कोणी नव्हत पण प्रसंगवधान राखून माझ्या मुलीन जवळच्या माझ्या भावाला बोलावलं. आताची हि फिट Pregnancy related नसल्यामुळ या वेळेला चक्रभाराभर फिरली.Blood Test, EEG, न्यूरॉलॉंजिस्ट इ. कडे तपासणी, रिपोर्ट्स, आणि निर्णय Abnormal Psychology च्या पुस्तकात एपिलेप्सी/ अपस्मार (म्हणजेच फिट) शब्द वाचताना आला होता. त्यात फिट्चे सामाजिक आणि मानसिक परिणाम, वैद्यकीय परीणामांपेक्षा जास्त वाईट असतात, हे वाचल्याच आठवत होत. मला फिट येते किंवा येऊन गेली असं ऐकल्यावर लोकांचे चेहरे बदलतात हे लक्षात येत होत. पण मला माझ्यात काहीच बदल जाणवत नव्हता.फक्त घ्याव्या लागणा-या गोळ्यांमुळे प्रचंड झोप यायची. फक्त हाच काय तो बदल. मग का बर लोकांच्या दृष्टीकोनातून बदल व्हावा? मी डॉक्टरांचा पीच्छा पुरवला कि मला नेमक काय झालाय ? काय होतय ? हे जाणून घ्यायच आहे. शेवटी त्यांनी मला एक छोटेखानी माहिती पुस्तक दिल. ते मी अधाशाप्रमाणे वाचाल. त्यात 'सन्मान ' ह्या आधारगटाची आणि डॉ. प्रविणा शहा ज्यांनी या गटाची स्थापना केली त्यांचा फोन नंबर होता. मी त्यांना एका शनिवारच्या सन्मान सपोर्ट ग्रुप मिटीगच्या वेळेला भेटायला गेले. हि गोष्ट आहे१९९२ डिसेंबरची त्यानंतर मी प्रत्येक शनिवारी दुपारी मिटीगला जायला लागले. हळूहळू एपिलेप्सी - अपस्माराचे वेगवेगळे प्रकार, होण्याची कारण आणि मानसिक- सामाजिक परिणाम कळट गेले.

याच सुमारास मी मुलाच्या शाळेत Parent - Teacher Meeting ला गेले होते. क्लास टीचरनं मला मीटिंगनंतर थांबायला सांगितलं. मी नेहमीचे प्रश्न विचारले - बोलतो का? मुलांमध्ये मिसळतो का? त्याला कळतंय का? त्या म्हणाल्या, प्रगती ठीक आहे, कमी बोलतो, पण त्याला सगळ कळतय. तरीसुद्धा एक गोष्ट विचित्र वाटतेय टी मला सांगितल्याशिवाय राहवत नाही. एकदा वर्गात, तो अचानक काही कारण नसताना खूप रडला आणि एकदा खूप हसला. मी खोदून - खोदून विचारल कि तो कधी तंद्री लागल्यासारखा करतो का? माझ्या मनात Complex - Partial epilepsy - फिटच्या एका प्रकारची शंका आली. त्या म्हणाल्या, 'तसं काही नाही पण स्वत: मध्येच असतो आणि लिहायला मात्र अजिबात आवडत नाही. बाकीच्या मुलांनी लिहिताना हा आजूबाजूला बघत राहतो. बुद्धीन नक्कीच सर्वसामान्य मुलांप्रमाणे आहे पण तरीसुद्धा काहीतरी वेगळ आहे. नक्की काय ते सांगू शकत नाही. तुम्ही तुमच्या डॉक्टररांना दाखवा.' माझ्या पोटात कालवाकालव झाली.

आता मला डॉक्टरांकडे जायला ठोस कारण मिळाल. फेमिली डॉक्टर, होमिओपथी, पेडीअट्रीशन, सगळ्यांच्या वा-या झाल्या. दिसायला स्मार्ट, गोरा-गोमटा, तब्यतीन व्यवस्थित, जरुरीपुरत बोलण - मिसळण, प्रथमदर्शनी काही उणीव नाही. 'सगळ नॉर्मल आहे.', असाच सर्वांचा सूर असायचा. आमच्या Homeopath नं फक्त शंकेचा सूर काढला. त्या म्हणाल्या, 'माझ्या वाचनात Dyslexia नावाचा एक प्रकार आला आहे. तुझ्या मुलामध्ये त्याचीच काही लक्षण दिसत आहेत. आपण खात्री करूया.' पण त्यासाठी काय करायचं, कथ जायचं ते त्यांनाही माहित नव्हत. लगेचच घरी जाऊन Dictionary मध्ये अर्थ बघितला - 'Inability to read '. मला ब्रम्हांड आठवल. आम्हा नवरा - बायकोला वाचानाच प्रचंड वेड. मुलीलाही त्याची लागण झालेली. असं असताना याच्याबाबतीत असं घडावं? ती रात्र मी तळमळत काढली. लगेचच दुस-या दिवशी शाळेत जाऊन शिक्षिकेला विनंती केली कि एक पूर्ण दिवस मुलगा शाळेमध्ये कसा वागतो ते बघू द्या. त्यानंतर स्कूल counselor ला भेटले. तिन मला बरेच प्रश्न विचारले, काही सूचना दिल्या, उपाय सुचवले. तरीसुद्धा हा नक्की काय प्रकार असावा, हे समजून घ्यायला पाहिजे यासाठी आणखी एक घटना घडली.

आता रोहन सिनिअर के.जी. त एला होता. मौखिक गोष्टी आत्मसात करत होता. पण नेहमी आज्ञधारक, समजूतदार असणारा मुलागा, लिखाण म्हटलं कि पठ्ठा बोट उचलायचा नाही. एकदा शिक्षिकेन तक्रार केली कि तुम्ही त्याच्याकडून गृहपाठ करून घ्यायचाच असं ठरवलं. रोहनला कितीही समजावलं तरी तो ऐकेना. खेळ, लाच - लुचपातींचाही काही उपयोग झाला नाही, धाकेला पण बधला नाही. शेवटी माझा संयम संपला. मी त्याला धोपटायला सुरुवात केली. तो मोठमोठ्यान रडायला लागला. पण तरी पेन्सील हातात सुद्धा धरेना. मारून मी थकले. ह्याच्याकडून कस बर लिहून घ्यायचं ह्या ताणामुळ, भावनिक उद्रेकामुळ मला प्रचंड थकवा आला. आता मी काय केल तर ह्या मुलाला अद्दल घडेल अशा दृष्टिन मी त्याच्याकडे पाहिलं. तो माझ्याकडे अतिशय असहाय, आगतिक नजरेन बघत होता. हा क्षण माझ्या आयुष्यात अतिशय महत्वचा होता. मला जाणवलं कि माझ काहीतरी प्रचंड चुकतय. मुळात हट्टी नसणारा, शांत मुलगा असा का बर वागवा ? कळतंय व्यवस्थित, दिसतंय व्यवस्थित, फक्त वही - पेन्सिलीशी वैर, हे काय गूढ? मी परत सर्व डॉक्टरांना भेटले. डोळे - कान तपासून घेतले. परत शाळेत जाऊन counselor ला भेटले. झालेला किस्सा सांगितला. को-या, अक्षरांच्या जागी वेड्यावाकड्या रेघा ओढलेल्या, जास्त वेळेला खोड्ल्यामूळ जागोजागी फाटलेल्या वह्या नेऊन दाखवल्या. सर्व ऐकून, बघून त्यांनी आम्हाला Wadia Child Guidance Centre (CGC ) ला जायला सांगितलं. तिथे प्राथमिक माहितीतच मी त्याच्या खेपेला गरोदर असताना आलेल्या फिटबद्दल सांगितलं. त्यानंतर त्याची I .Q test ( बुदधीमत्ता चाचणी ) झाली. त्याचा I . Q ( बुद्ध्यांक ) - १०० म्हणजे सर्वसामान्य मुलाइतकाच (९०-११०) आला. Learning Disability - ( शैक्षणिक / अध्ययन अक्षमता ) ची टेस्ट झाली. निष्कर्ष - मला आलेल्या फिटमुळे त्याच्या थोड्या प्रमाणात मेंदूला इजा पोहचली असण्याची शक्यता असून, border line सीमारेषेवरील शैक्षणिक/ अध्ययन अक्षमता (Learning Disability - LD ) निर्माण झाली असावी.

आताशी कुठ एपिलेप्सिशी तोंडओळख होत होती. तेवढ्यात Learning Disability नं हात पुढ केला होता. हात मिळवायचा कि नाही ते मी ठरवायचं होत. पण गाठ कोणाशी आहे, मैत्री जमेल कि नाही, ते कस कळायचं? त्यावेळेला वाडिया CGC मध्ये वाचल्याच आठवल - When God closes one door, he opens another. या सेंटरच्या रुपान एक दरवाजा खुला झाला होता.

वाडीयामध्ये Remedial Therapy - सुशारोद्देशी उपचारासाठी बोलवायचे. तिथली Special Educator डॉ. बाना खास पद्धीतन शिकवायची. सुरुवातीला ये-जा नको, म्हणजे मीही तिकडेच बसायचे. नंतर मुद्दाम बसायला लागले. त्या काय सांगतात, कसं शिकवतात ते पहायचं. त्यांना विचारायची कि रोहन आहे त्याच शाळेत शिकू शकेल ना ? का खास, विशेष शाळा असतात त्यात त्याला घालाव लागेल? बुद्धीन व्यवस्थित फक्त लिखाण हाच प्रोब्लेम असेल तर अशा मुलांसाठी शाळा असते का? पुढच्या वर्गात गेल्यावर त्याला अभ्यास झेपेल का? हि थेरेपी किती दिवस चालेल? शाळा समजून घेईल का? प्रश्न,प्रश्न, प्रश्न .

ह्या प्रश्नांना वाडिया चाईल्ड गाईडन्स्मधल्या समुपदेशक - इटालिया आणि स्पेशल एजुकेटर डॉ. बाना न कंटाळता, समजून घेऊन मार्गदर्शन करायच्या. डॉ. बानांनी मला शैक्षणिक अक्षमता असलेल्या एका यशस्वी कलाकाराचे व्यक्तिगत अनुभव वाचायला दिले. त्यामुळ मला अशा व्यक्तींच्या आयुष्यात डोकावता आल आणि लिहिता-वाचत-मोजता येत नाही म्हणजे नेमक काय होत याचा अंदाज आला. आतापर्यंतचा अनुभव आणि स्पेशल एजुकेटरच समजावण यातून मला उमजल होत कि मुद्दाम, हट्टीपणा किंवा आडमुठेपणामुळे मुल असं वागत नाही तर खरच अशा अशा मुलांना, व्यक्तींना संवेदन अडथळे (Perceptual difficulties) असतात. त्यामुळे त्यांच्या अध्ययनात कमतरता निर्माण होते. हि कमतरता दूर करण्यसाठी सुधारोद्देशी उपचार (remedial exercise) असतात. रोहन मन लावून डॉ. बानांनी दिलेलं लेखी exercises करायचा. त्या प्रत्येक गोष्ट साधी - सोपी, विशद करून सांगायच्या. इंग्रजी सूचना, शब्द नाहीच कळले तर हिंदी - मराठीतून समजवायच्या. आमची मातृभाषा कोंकाणी त्यामुळ अगदीच नाही कळलं तर मी कोंकाणीतूनसांगायचे. डॉ. बानांनी वाडीयामध्ये येण प्रथम दोन ओळींच्या वहीमध्ये अर्ध - पूर्ण वर्तुळ, उभ्या - आडव्या - तिरक्या रेषा, ज्या गोष्टींपासून इंग्रजी अल्फाबेटस बनतात अशा आकृत्या, चिन्हांचा त्यांनी सराव करून घेतला. मग साधे, सोपे शब्द शिकवायला सुरुवात केली. ध्वनी आणि त्यानंतर लिहायचे. रोहांमध्ये बरीच सुधारणा होती. मुख्य म्हणजे माझ्या लक्षात आल होत कि प्रयंत्न खूप करावे लागतील पण समाधानाची बाब एवढीच होती कि त्यांना आता दिशा मिळाली होती.

जरा कुठ मी सुटकेचा नि:श्वास टाकला होता तेवढ्यात डॉ. बानांना वाडीयामध्ये येण जमेनासं झालं. काही वेळेला मी रोहनला त्यांच्या प्रायव्हेट क्लिनिकला घेऊन गेले पण ते माझ्या घरापासून खूप लांब होत. रोहनची शाळेची वेळ, माझ ऑफिस हे सगळ सांभाळून त्याला नेण मला कठीण जाऊ लागले . पाऊण - एक तासाच्या थेरपीकरता दोन तास प्रवासात जायचे. बाना टीचर जे काही घ्यायच्या ते मी घरी व्यवस्थित करून घ्यायचे . माझी आवड, कल बघून त्यांनी मला त्यांच्या वेगवेळ्या ठिकाणी होणा-या कार्यशाळांना बोलवायला सुरुवात केली. त्यातूनही मी खूप गोष्टी शिकले. पण एवढ पुरेस नव्हत. आता यापुढे थेरेपी चालू कशी ठेवायची हा मोठा प्रश्न होताच. पालकांसाठी शैक्षणिक अक्षमतेवर (Learning Disability- LD) प्रशिक्षण कुठ मिळत का याची चौकशी मी सुरु केली. १९९३ ची गोष्ट आहे. त्यावेळेला प्रशिक्षण केंद्र खूपच कमी माहिती होती आणि होती ती संशोधनात्मक व पुस्तकी. अशा वेळेला खास प्रशिक्षण - Special Education चे छोटे- मोठे कोर्सेस, प्रशिक्षण कुठ मिळेल यासाठी जंग जंग पाचादल. १९९४ उजाडलं होत. मला S.N.D.T. Juhu येथे B.ED in Special Education चा कोर्से असल्याच कळलं. पण मुख्य अडचण म्हणजे हा कोर्से एक वर्षाचा आणि नऊ ते चार या वेळात होता. आता काय करायचं ? नोकरीच काय? विचार केला - अर्ज तर करून बघूया काय होतय ते? पुढच पुढे. लेखी - तोंडी प्रवेश परीक्षेसाठी बोलावलं गेल. दोन्हीमध्ये चांगले मार्क पडले. मानसशास्त्राची पदवी कामी आली होती. मनात ठरवलं होत - बिनपगारी सुट्टी घ्यायची, वेळ पडल्यास नोकरी सोडायची. (पण तशी वेळ आली नाही. अजूनही माझी नोकरी चालू आहे) पण कोर्सेला जागा मर्यादित होत्या, माझी नोकरी, वय लक्षात घेऊन नावं वेटिंग लिस्टवर टाकल. खूप विनवण्या केल्या. सुदैवानं एक मुलगी गळाली आणि कॉलेज चालू होऊन जवळजवळ एक महिन्यानंतर मला SNDT त प्रवेश मिळाला. मला अगदी कोलंबसला अमेरिका गवसल्याच्या आनंदाचा प्रत्यय आला.

१९८४ मध्ये मातृत्वाच्या उंबरठ्यावर उभी असताना, अनाहूतपणे फिटच्या रुपात आलेल्या ह्या पाहुण्यान अधून- मधून आपला इंगा दाखवून, ह्या दहा वर्षांच्या प्रवासात मला अनेक डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, एपिलेप्सी आधारगट, पालकांचे LD साठी असलेले आधारगट अशा कित्येक ठिकाणी फिरवून आणल होत. एव्हाना, नाटक - गाण्याच जग मागे पडल होत. आता एपिलेप्सीवर जनजागृतीची गाणी आणि नाटक लिहण - बसवण एवढ्यापुरता नाटक - गाण्याशी संबंध उरला होता आणि एका दशकानंतर - १९९४ मध्ये आणखी एका नव्या जगाची ओळख करून घेण्यासाठी SNDT च्या दारात मी उभी होते.

रोहनच्या शैक्षणिक अक्षमतेमूळे , मी पुन्हा एकदा पदवीनंतर १३ वर्षांनी, शिक्षणाच्या दालनात शिरले होते. काय म्हणावे ह्या योगाला? माझ्या कॉलेज जीवनाला पुनश्च सुरुवात झाली तेव्हा रोहन तोंडी परीक्षेच्या जोरावर, मागच्या वर्षीच्याच कोऱ्या वहिंसकट पहिलीत गेला होता. माझा हा कोर्से फक्त LD साठी नव्हता तर भिन्न अपंगत्व असलेल्या मुलांना शिकवण्यासाठी उपयुक्त असलेला अभ्यासक्रम होता. वर्गात आम्ही वीस- पंचवीस मुली होतो. माझ्याबरोबर एक मतिमंदत्व असलेल्या मुलाची आई होती, स्वत:ला LD असलेल्या दोन मुली होत्या. बाकीच्या राहिलेल्या, नुकत्याच पदवीधर झालेल्या, पुस्तकांमधल्या छापील ओळीपलीकडे जग न बघितलेल्या अश्या होत्या आणि मी, रोहनने , कुठे आणि कसं लिहायचं ते न कळल्या मुळे , दोन ओळींच्या मध्ये गिचमिड अक्षरात लिहिलेल्याचा अर्थ लावण्याचा प्रयन्त करीत होते. नियतीचा हा उलटा डाव परतवायला बघत होते.

उलटा डाव च म्हणायला हवा. कारण सातत्याने उलट बोलणे उदा. गदा च्या एवजी दगा , लिहिणे , वाचणे हि प्रामुख्यान शैक्षणिक अक्षमतेची लक्षणे आहेत. बरीच लहान मुले असं करताना आढळतात पण सतत b च्या एवजी d लिहीणे, M ऐवजी W लिहीणे , प्रतिबिंबबासारखे (mirror image ) लिहीणे, वाचताना-लिहिताना पुनरावृत्ती किंवा एखादा शब्द तसेच मधले अक्षर गाळणे तसंच वेळेच अवधान राखता न येणे , धांदरट - वेंधळा - आळशी अशी विशेषण आपण ज्याला सहज लावू शकू अशी हि LD असलेली मुले असतात. फळ्यावर बघून वहीत उतरवायला न जमण, एका वेळी जास्त सूचना दिल्यास गोंधळ, चित्त एकाग्र न करता येण, डाव्या - उजव्यात गोंधळ करणे अशी लक्षण भिन्न- भिन्न प्रमाणात ह्या मुलांमध्ये आढळतात.

ह्या LD मध्ये डीस्लेक्सिया - (Dyslexia ) - वाचानदोष, डीसग्रफिया- (Dysgraphia )- लेखनदोष डिसकलक्युलीया -(Dyscalculia ) गणनादोष आणि डिसप्रक्सिया (Dyspraxia) असूत्रता दोष असे मुख्य प्रकार आढळतात. पण ब-याचदा बाकीचे तीन प्रकार डीस्लेक्सियाच्या छत्रीखाली आडोशाला असतात. सुरुवातीला हे सर्व प्रकार लक्षात यायला कठीण जात. कारण दिसायला हे मूल सर्वसामान्य मुलाप्रमाणच असत. बुद्धीमत्तासुधा नॉर्मल - ९० ते ११० बुद्ध्याकाच्या (I . Q) कक्षेत असते. अनुवंशिकता, गर्भात असताना - जन्माच्या वेळी झालेला त्रास हि LD ची कारण असू शकतात. बहुतेक वेळेला एखाद्याच क्षेत्रात उदा. वाचण किंवा लिखाणात जास्त प्रमाणात अडथळे येतात. हि विषमता कळायला जड जात.

शैक्षणिक अक्षमतेचे हे नाना पैलू मला कॉलेजमध्ये गेल्यावर उलगडत गेले. एवढ्या वर्षानंतर नव्यान अभ्यास, मला वाटल होत तेवढा जड गेला नाही. कर जोडीला जिद्द होती ना ! पण सतत वेळेत lesson plans तयार कारण Projects चाचण्याच्या मापनासाठी लागणार संख्याशास्त्र भेडसवायच. गणिताशी माझ हाडवैर होत पण Sates शी सुद्धा तह करावा लागला. अशा गोष्टीनी मी अधून - मधून हैराण व्हायची. पण तरीही नव्या जोमान कामाला लागायची. कारण वर्गात जे काही शिकवलं जायचं ती तंत्र, नवीन कल्पना घरी येऊन मी तात्काळ अमलात आणायची. ह्या सर्व गोष्टींमुळ रोहनमध्ये झपाटयान सुधार होत होता. मला एक नवीन दृष्टी मिळाली होती. त्याला ञानची बैठक आणि अनुभवाची जोड लाभली होती. बा-याचदा लोक मला विचारतात कि तुझ्या फिट्स आणि रोहनची LD बरी कधी होणार. पण हा काही तपासारखा आजार नाही कि जो चार दिवसात बरा होतो. अपस्मार/ शैक्षणिक अक्षमता/ लर्निंग डीसेबिलीटी/ डीसलेक्सिया / लर्निंग डीफीकल्टी प्रोब्लेम हि काही नावं. त्या पूर्णपणे ब-या होऊ शकणार नाहीत पण त्यावर नियंत्रण नक्कीच मिळवता येईल सुधार नक्कीच होईल.

लहानपणापासून आई - बाबांच्या वागण्याचा ठसा माझ्यावर उमटला होता. कुठल्याही गोष्टीची त्या दोघींनी तक्रार केलेली मी ऐकली नव्हती. नेहमी म्हणायची - What can not be cured, must be endured. नकळत ती सवय मला लागली असावी. तिच्या ह्या आवडत्या वाक्यात थोडे फेरफार करून मी माझ्या आयुष्यात वापरले. What can not be cured, must be controlled असं म्हणत नियातपणे. एपिलेप्सी प्रतिबंधक गोळ्या (Anti - epileptic Drugs - AEDs) घेत राहिले. रोहनच्या - LD च्या बाबतीत What can not be cured, must be corrected म्हणत शिकवत राहिले.

बहुतांशी LD असलेल्या मुलाचं कस असत कि त्यांची बुद्धिमत्ता नॉर्मल असते पण अध्ययनासाठी, नवीन गोष्ठी शिकवण्यासाठी मेंदूच्या आपण ज्या मूलभत प्रक्रिया वापरतो त्यांच्यामध्येच दोष असतो. उदा. फळ्यावरून वहीत उतरवण्याची साधी क्रिया घ्या , त्यामध्ये किती गोष्टींची गरज असते. बघा ह. दृक - संवेदना ( Visual Perception), स्मरणशक्ती (Memory) ग्रहणशक्ती (grasping ) आकलनशक्ती (Comprehension) लिहिण्याची कारक क्रिया - अक्षर जशीच्या तशी उतरवण, वर फळ्यावर बघण. परत खाली बघून, जिथ थांबलो तिथून पुन्हा सुरु करण, परत फळ्यावर जिथपर्यंत लिहील होत तो शब्द शोधन आणि लिहीण. आपल्याला वाटल कि किती सोप आहे. फळ्यावरून जसच्या तस फक्त उतरवायचं तर आहे. पण वाटत - दिसत तेवढ सोप नसत ते. लिहिण्याच्या ह्या कृतीमध्ये वरील कुठल्याही पायरीवर मूल अडखळू शकत. आणि त्याची गती मंदवाते तोल जाऊ शकतो. बाकीच्या मूल, त्यातली काही तर एकेक पायरी सोडून अत्यंत जाल्गातीन हा लिहिण्या - उतरण्याच्या जिन्यावर चढ - उतार करताना दिसतात. आणि हे मूल हताश होऊन बाकी मुलांचा हेवा करीत टीप गळीत बसलेले असते. पण आपल्याला वाटत एवढ साध ह्याला जमू नये? नक्कीच हा आळशी आहे. प्रयन्तच करायला नको मुळी!

भगीरथ प्रयन्त करूनसुद्धा LD असलेल्या मुलाला जमेलच असं नाही. सध्या- सोप्या शब्दात सांगायचं झालं तर काच-यामूळ, गाळामुळ बंध झालेल्या छिद्रातून आपण चहा अलायला गेलो तर तो गालाला जात नाही. आपला मेंदुसुद्धा एका प्रकारच गाळणच आहे. त्याची छिद्र म्हणजे दृक - श्रवण - अवकाश संवेदना , स्मरण - आकलनशक्ती, संयोजन, ढोबळ- सूक्ष्मकारक क्रिया ह्या आहेत. सुधारद्देशी उपायानी (remedial therapy) हि छिद्र म्हणजेच ह्या वर उल्लेखलेल्या प्रक्रिया स्वच्छ, मोकळ्या झाल्या तरच आकालान्रूपी चहा गालाला जाईल. प्रक्रियांमध्ये दोष आहे. हे जरी कळलं तरी नेमक्या कुठल्या प्रक्रिया (Process) त्याचं मिश्रण - प्रमाण हे शोधण कठीण असत. त्यामध्ये बराच वेळ जातो. ह्या विश्लेषणानंतर सुधारोद्देशी उपचार चालू होतात.

रोहनच्या बाबतीत लेखनदोषाच Dysgraphia च प्रमाण जास्त होत. त्याच स्नायूमूळे होणा-या कारक हालचालीच संयोजन (Muscle - motor Co- ordination) योग्यरीत्या होत नव्हत. त्यामुळे फक्त लिखाणाच नव्हे तर खेळ - बॉल पकडण, फेकण, क्रिकेट इ. खान-पिण, शुलेस बांधण, शर्टाची बटन लावण. केस विंचरण ..... किती गोष्ट सांगू? वर्षानुवर्ष त्याला मित्र, फिल्डिंगला एका कोप-यात उभ करायचं कि जिकडे बॉल जाण शक्य नाही. सगळ्या हालचाली ढोबळ असायच्या. स्वच्छ - सुवाच्य अक्षर, सुबकता नावाला असायचा नाही. त्यातून रोहन डावरा म्हणजे आणखीनच ओंढाल. त्याला शिकवताना आधी ती गोष्ट मी डाव्या हातान करून पाहायचे. छोट्या छोट्या गोष्टी आपण डाव्या बाजूला वही काळाती करून लिहायला सुचवलं. Put your right hand in, put your left hand in......... हि nursery rhyme म्हणताना नेहमी गोंधळायचा. लहान मुलांना शिकवलं जात कि तुम्ही ज्या हातां खाता तो तुमचा उजवा हात. इथेही उलटा मामला. रोहन डावरा होता आणि डाव्या हातनच जेवायचं. त्यामुळ आणखी गोंधळायचा. मी मग त्याच्या डाव्या- उजव्या तळहातावर स्केच पेनन L & R असं लिहून ठेवायची. मग त्याला सोप जायचं. हळूहळू त्याला डाव्या - उजव्या शरीरभागांची ओळख झाली.

मला तर वाटत कि Velcro टेपच्या शोधाचा उगम LD तच असावा. शू लेस बांधता न येण, यावर वेल्क्रो हा उत्तम पर्याय होता. पण मला माहित होत कि हा तात्पुरता उपाय, एक तोडगा आहे. मूल प्रश्न आणि दोष यावर विशिष्ट उपचारच व्हायला हवेत. पण दिवसाचे चोवीस तास कामी पडत होते. माझा B .ED चा अभ्यास, रोहाचा शाळेचा अभ्यास, त्यानंतर त्याचे जे काही विशिष्ट प्रोब्लेम्स होते त्यासाठी लेखी, तोंडी exercises , कंटाळा येऊ म्हणून गेम्स आणि त्यातून शाळेतल्या विषयांशी संदर्भ जोडन, परीक्षेची पूर्वतयारी. लूटपूटच्या परीक्षा..... असं आणि बरच काही चालू असायचं.

ह्या सुमाराला मझी मुलगी प्रीती चौथित होती आणि रोहन पहिलीत. तिची स्कोलेरशिपच्या परीक्षेची तयारी चालू होती. चाचणी परीक्षा, घरी सोडवायला पेपर, जादा क्लासेस, वैगरे चालूच असायचे. तिचा अभ्यास घेताना रोहन आजूबाजूला खेळत बसलेला असायचा. ते इंग्लिश शब्द, व्याकरण, बोलण- लिहण रोहनच्या कानावर पडतच होत. अधून - मधून तो बहिणीबरोबर लायब्ररीत जायचा. चित्रांची पुस्तक घेऊन यायचा. माझ्या नावं-याला wild life ची भारी आवड. घरामध्ये त्याची सुद्धा खूप पुस्तक होती. त्याच्यातले कुठल्या पानावर कुठल चित्र आहे हे तो सहजगत्या सांगायचा. आम्ही विचारायचं आणि त्यां सांगायचं खेळच होऊन बसला. त्याची स्मरणशक्ती, राहाण करून, जतन करून आणि हव तेव्हा जसच्या तस सांगण्याची क्षमता उच्च कोटीची आहे हे लक्षात आल. आणखी काही असाधारण गोष्टी अचानकपणे आमच्या लक्षात आल्या.

एकदा मी कुठल्या ताटी घडलेल्या गोष्टच घरी वर्णन करत होते. म्हटलं- त्या दिवशी बुधवारी..... रोहन तथेच होता. म्हणाला- 'आई, त्या दिवशी बुधवार नव्हता. काही, शुक्रवार होता.' मी लेच कॅलेंडरमध्ये बघून खात्री केली. खरचं शुक्रवार होता. मला खूप आनंद झाला कारण त्याला दिवस- महिने- वर्ष थोडक्यात, काळाची संकल्पना कळण्यासाठी, फळ्यावरून उतरवण्याची सवय होण्यासाठी एका भिंतीला पूर्ण कला रंग देऊन त्याचा फळा बनवला होता, आणि दर दिवशी सकाळी उठल्यावर तारीख लिहायचो. मनात म्हटलं चीज झालं आणि त्याला शाबासकी दिली. आता रोहनला उत्तेजन मिळाल होत. मला म्हणाला- 'तू मला कोणतीही तारीख संग. मी तुला वर सांगतो.' त्याच्या फुशारकीच हसूच आल पण म्हटलं एक तारीख सांगायला काय जातंय ? कुठली तरी एक तारीख सांगितली. उत्तरादाखल ताडकन अचूक वार सांगितला. आणखी दोन - तीन तारखा विचारल्या. त्यांचेही अचूक वार सांगितले. आता हा काय नवीन प्रकार असा विचार करतानाच पुढे तो म्हणाला- चालू महिन्याचे किंवा वर्षाचे नको विचारू. मला त्याच्याआधीचा पण वार सांगोत येतो. त्याची शिक्षिका समजणारी मी, पस्तिशीतही उलटी मूठ करून मोजल्याशिवाय महिन्याचे तीस का एकतीस दिवस हे खात्रीपूर्वक सांगता येत नव्हत. आणि माझा सहा- सात वर्षांचा पोर छातीठोकपणे वीस वर्षामागाचे अचूक वार सांगता होता. नेहमी साशंकपणे वावरणारा आत्मविश्वासाने फुलाला होता.

ह्या विसंगतीन मी पूर्ण चक्रावून गेले होते. ज्या तारखांचे तो अचूक वार सांगत होता तेच त्याला लिहायला सांगितलं तर अद्याप रोहन उलटच लिहित होता. परत परत खोदून कंटाळल्यावर म्हणायचा- अग, टीचरला आता मी उलट लिहितो ते माहिती आहे. कस समजवायचं? मग मी युक्तिवाद करायचे. तुझ्या नावात R च्या ऐवजी M घातलं तर काय होईल? म्हणाला- मोहन होईल. मग तू राहशील का? बदललास कि नाही? असं विचारल्यावर निरुत्तर होऊन पुन्हा प्रयत्न करायचा. नशीब माझ, तोपर्यंत त्याने शेक्सपियर वाचला नव्हता नाहीतर नावात काय आहे म्हणून पुन्हा उलट लिहायला मोकळा झाला असता.

पण तो शेक्सपियरपर्यंत नक्की पोचेल अशी आशा मला वाटू लागली ; कारण चित्राची पुस्तक, छोटे शब्द, सोपी वाक्य अशी मजल मारत तो कॉमिक्स, मोठ्या गोष्टींच्या पुस्तकांपर्यंत कधी पोहोचला कळालच नाही. संध्याकाळच्या वेळेला कॉलनीमध्ये एखाद्या दिव्याखाली पुस्तक वाचत बसलेला आढळायचा. पण हि झाली सगळी नंतरची गोष्ट. जेव्हा वर्गात त्याला A for Apple शिकवत होते तेव्हा त्याला त्या अल्फाबेट चार्टमधल एकही अक्षर ओळखता यायचं नाही. त्या वेळेला WWF (world wresting federation) च्या कुस्तीच मुलांमध्ये फार वेड होत. रोहनसुद्धा टी. व्ही. ला चिकटून असायचा. WWF च्या योदध्यांचे वजन, उंची आणि नावं लिहिलेली पत्त्यांसारखी कार्ड मिळायची. मुळाक्षरसुद्धा येत नव्हती. पण एकदा मी त्याला त्या कार्डस्वर काय लिहिलंय ते वाचण्याचा प्रयन्त करताना मी बघितलं आणि मला एक कल्पना सुचली. कहर तर हा मारामारीचा प्रकार मला अजिबात आवडत नाही पण मी ह्या योदध्यांची आजन्म ऋणी आहे. रोहनची आवड आणि त्यांच्याबद्दल जास्त जाणून घ्यायची धडपड बघून मी एक नवीन अल्फाबेट चार्ट बनवला. A for Apple च्या ऐवजी आमच्या घरी A for Arnold, B for Beefcake, C for Crush, D for Doink असा z पर्यंतचा तक्ता लागला. आकडे उलटे लिहायचा. पण ह्या योदद्याच वजन, उंची उतरवायला कंटाळायचा नाही. चुकल तरी दुरुस्त करी. हळूहळू लिखाण सुधारत गेल. शाळेत काय चाललय ते मला घरी कळण्याइतपत लिहू लागला. चांगल लिहील कि बक्षीस म्हणून या योदद्यांचीच स्टिकर्स, फोटो द्यायचे. मौखिक आणि लिखित कृतीत जरी दरी असली तरी ती आवड आणि प्रेरणेन बुजवता येईलस वाटू लागल.

माझा कोर्से संपून मी आता B . Ed in special education ची पदवीधारक होते. रेमेडीयल टीचर बनले होते. मला खरचं वाटत नव्हत, कारण मी जेव्हा SNDT हा Course करायचा ठरवलं तेव्हा ब-याच जणांनी शंका व्यक्त केली होती कि झेपेल का? वस्तुनिष्ट्पणे रोहनच्या दोषांचा अभ्यास करून प्रगती करता येईल का? भावनावश होशील वगैरे. पण ह्या भावनिक गुंतवणुकिनच भावनावशतेन मला नेहमीच जास्तीत जास्त प्रयन्त करण्यासाठी उद्युक्त केल. मला आठवतय, माझी ही एपिलेप्सिवरची औषध ( Anti Epileptic Drugs -AEDs) सकाळ - संध्याकाळ दररोज घ्यावी लागत. (अगदी परवापर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घेत होते) आज बाजारात मिळताहेत तेवढ्या कामी दुष्परीणामांच्या गोळ्या त्यावेळी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळ मला कॉलेजमध्ये प्रचंड झोप यायची. त्यासाठी खुपदा कडक चहा- कॉफी घ्यावी लागायची. औषधांमध्ये बदल, परत नवीन गोळ्यांची सवय होण ह्या सर्व गोष्टी चालू असायच्या. पण कधी माझ्या डोक्यात 'हे माझ्याच वाटणीला का?' असं आल नाही. त्याची कारणही बरीच आहेत. एक तर मला आयुष्यात (आत्तापर्यंतच्या ) फक्त तीनच फिट्स त्याही चार- चार वर्षांच्या अंतरान आल्या. माझ लग्न, नोकरी, मुल- बाळह्या गोष्टी पार पडल्या होत्या. आमच्या घरची, आईच्या कडची सगळीच जण सुजाण, समंजस असल्यामूळ माझ्या फिटचा बाऊ कधीच झाला नाही. फिट्स भांडवल मी केल किंवा फिट्मुळे घरामध्ये बोलणी खावी लागली वगैरे प्रकार कधीच झाले नाहीत.

'फिट येण' हा एक मेंदूशी संबंधित विकार असून नियमित औषधांनी नियंत्रित होऊ शकतो. फिट्चे वेगवेगळे प्रकार आहेत पण सामन्यात: मोठी फिट ज्यामध्ये व्यक्ती बेशुध्द होते, हात- पाय झडते, डोळे फिरवते, मुठी आवळते हे लोकांना ऐकून किंवा पाहून माहिती असत. पण छोट्या फिटसमध्ये व्यक्ती एकटक तंद्री लावून शून्यात बघत राहते किंवा पोटावरून सारखा हात फिरवते, मिटक्या मारत असल्यासारखं किंवा ओठांवरून जीभ फिरवते अशा कृती केल्या जातात. सर्व त-हेच्या फिट्स दीड - दोन मिनिटात ओसरतात. पण त्या जर एकामागोमाग येत राहिल्या किंवा बराच वेळ व्यक्ती शुद्धीवर आली नाही तर डॉक्टरना बोलावाव बराच वेळ व्यक्ती शुद्धीवर आली नाही तर डॉक्टरांना बोलवावं लागत. पण बहुतांशी तशी वेळ येत नाही. व्यक्ती आपोआप पूर्ववत होते. फक्त प्राथमिक उपचार लक्षात ठेवावे लागतात ते म्हणजे व्यक्तीला इजा पोहोचणार नाही अशा ठिकाणी झोपवण, हालचालींना प्रतिबंध न करण, कांदा - चप्पल न हुंगवण, तोंडात चमचा/ चावी न घालण तसंच काही खायला - प्यायला न देण. हे झालं काय करू नये पण काय कराव म्हटलं तर शक्यतो डोक्याखाली टोवेळ, कपडा ठेवण, टाय असेल तर सैल करण. तोंडातून फेस आला असेल तर पुसण इ. मुख्य म्हणजे कोंडाळ न करता मोकळी हवा मिळू देन गरजेच असत. ह्या प्राथमिक उपचारांच्या बाबतीत जनजागृतीच गरज असते कारण पहिल्यांदा फिट बघितलेला माणूस निश्चीतच घाबरतो. मी स्वत: वरून सांगते. आमच्या आधारगटाच्या मिटींगच्या वेळेला एका मेंबेरला मोठी फिट आली तेव्हा मलाही वाटल. हा आता नक्की शुद्धीवर येईल ना? त्याला खूप वेदना होत असतील का? पण नाही. दोन मिनिटांनी तो शुद्धीवर आला. थोडाच वेळ त्याला स्वत:ला सावरायला लागला. मग पुन्हा तो मिटींगमध्ये सामील झाला.

फिट्समूळे दैनंदिन व्यवहारात खंड नक्की येतो पण आयुष्यात अडथळे येतात ते फिट/ आकडी / अपस्मारविषयीच्या समाजाच्या दृष्टीकोनामुळ, गैरसमाजुतीमुळ आणि पूर्वग्रहमुळ. लहानपणापासून जर एखाद्या मुलाला फिट्स येत असतील किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये ह्या फिट्सच प्रमाण जास्त असेल तर त्याच संपूर्ण आयुष्य त्यामुळ झाकोळून जात. अशा वेळेला हा फक्त शारीरिक विकार न राहता मानसिक आजारसुद्धा बनतो. तो कसा बनतो याचा अनुभव मला काहीच दिवसात आला.

एक दिवस माझी मुलगी रडत - रडत माझ्याकड आली. जेमतेम दहा वर्षांची असावी ती तेव्हा म्हणाली- 'आई, तुला फिट्स येतात ना म्हणून त्या बाई तुला 'वेडी' म्हणतात.' 'आई, खरचं तू वेडी आहेस का?' कोवळ्या मनाला घडवायचं बाजूलाच राहील पण त्या संस्कारक्षम मनामध्ये पूर्वग्रहाच, गैरसमजुतीच बीज पेरणा-या त्या 'शहाण्या' बाईबद्दल आलेला प्रचंड राग दाबत मी मुलीलाच शांतपणे विचारल- 'तुला काय वाटत?' ती म्हणाली - बिलकूल नाही. तू त्यांच्यापेक्षाही शहाणी आहेस. मी तिला समजावलं- 'अशा लोकांशी मला कर्तव्य नाही. तुला माझ्याबद्दल काय वाटत फक्त तेच महत्त्वाच आहे.' मला वाटत तेव्हापासून ती माझी आणि रोहनची देवदूत Guardian Angel बनली. अतिशय समंजस, तीन कधीही रोहनला द्याव्या लागणा-या जास्त वेळेबद्दल तक्रार केली नाही. दोघ शाळेत स्कूल बसन एकत्र जायचे, तेव्हा कोणाची त्याला त्रास द्यायची, चिडवायची हिंमत व्हायची नाही. पण वर्गात एकटा असताना मूल त्याला त्रास द्यायची. जरा मोठा झाल्यावर तीन त्याला उलट प्रतिकारसुध्दा करायला शिकवलं. पण मी जाणून आहे कि रोहनन कित्येक वार एकट्यान निमूटपणे झेलले आहेत.

ह्या सर्व प्रवासात माझी फार दमणूक झाली नाही; कारण मी फार दमतेय असं वाटल कि इंजिन बदललं जायचं. अशा वेळेला देवराय, माझा नवरा टेक ओव्हर करायचा. अभ्यासच खात मी सांभाळत होते आणि मौज- मजेचं खात त्याच्याकडे होत. प्रीतीन लहान असताना त्यानं केटरिंगचा व्यवसाय चालू केला होता. त्याची बँक ऑफ इंडियातली नोकरी, हळूहळू फुलात, विस्तारत गेलेला व्यवसाय यामूळ त्याला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा मुलांची चंगळ व्हायची. नव- नवीन पदार्थ करण, फिरायला जाण, गिर्यारोहन इ.... सासूबाई स्वयंपाकघराचा चार्ज सांभाळत. काही लागलंच तर आई जवळच होती. माझ्या भाऊ - वाहिनींचाही मला मोठा आधार होता. माझे दोन्ही भाचे आणि रोहन नेहमी एकत्र असत. मी एका मोठ्या कॉलनीत राहत असल्याचा रोहनच्या सामाजीकिकरणात (Socialisation) खूप सकारात्मक प्रभाव झाला. खेळ, स्पर्धा, नाटक यातून सहभागाची संधी मिळाली. शाळेचा दृष्टीकोनही कायम सहनशील होता. वेळोवेळी त्याला प्रोत्साहन दिल. वस्तुनिष्ठ प्रश्न असल्यामूळ रोहनला जड जाणार नाही म्हणून शाळेन चौथीत स्कोलरशिपच्या परीक्षेलाही बसवलं. आम्ही कसून मेहनत घेतली. तो पास तर झालाच पण स्कोलरशिप फक्त तीन मार्कांनी हुकली. त्यालाही आपण काही करू शकू, असा विश्वास वाटायला लागला.

मी ठरवलं आता हळूहळू नळ तोडली पाहिजे. त्या दिशेन प्रयत्न सुरु झाले. पुर्वीसारख मी शाळेत जाऊन रोहांचा प्रोम्ब्लेम सांगण, विचारण बांध kel. अधून- मधून वह्या तपासायचे. परीक्षेच्या वेळी पेपर सोडवून घ्यायचे. आधी फक्त वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवायचे, आत्मसात करायचे, वेळ लावून बाकी प्रश्न लिहून काढायचे असं करत ब-यापैकी मार्कांनी पास होत होता. एक दिवस मला Maths teacher न बोलावलं आहे असा निरोप आला. त्या म्हणाल्या- रोहन वर्गात काही लिहित नाही पण उत्तर कॉपी करतो. रोहनचा प्रोम्ब्लेम माहित नव्हता. ही सहावीची गोष्ट असावी. अजूनही त्याला फळ्यावरच सर्वव्ह्या सर्व उतरवण जमायचं नाही. वहीचे मार्क आम्ही जमेस कधीच धरले नाहीत. माझ्या दृष्टिन त्याला एखादी 'संकल्पना' कलन हे जास्त महत्वाच होत. त्याच्या क्षमतेप्रमाणे जेवढ जास्तीत जास्त लिहिता येईल तेवढच लिहिण्याची त्याच्यावर सक्ती होती. नेहमीच त्याच्या मनावर बिंबवल होत कि मार्कांची परवा करायची नाही पण प्रयत्न करत राहायचे. एवढ सांगूनही मार्कांसाठी कॉपी केली? मी खडसावून रोहनला तर तो म्हणाला - अग आई, मला आता कुठलाही तीन अंकी, चार अंकी गुणाकार - भागाकार, स्क्वेअर रूट इ. तोंडी करता येतात पण लिहिताना चुकायला होत. म्हणून मी कृती मनात करतो आणि फक्त उत्तर व्यवस्थितपणे लिहितो. रोहन एव्हाना ४३७ आणि ८९५ च उत्तर काही सेकंदात द्यायचा. ७२९ चा अगम्य पाढा म्हणायचा. पण लिहिताना अड्खाळायाचा अशी मजल - दरमजल करीत रोहन दहावीत येऊन ठेपला. राइटर तसंच पैशाच्या व्यावहारिक बाजुबाद्दलाही खूपच अनभिज्ञ होता. Writer घ्यावा का असा माझा विचार चालू होता. शाळेकडे - बोर्डकडे अर्ज करण्याआधी म्हटलं रोहनचा विचार घेऊया. कारण त्यानं सांगण, राइटरन ते लिहीण याचाही सराव करावा लागला असता. टर हा म्हणाला- 'माझ्या लिखाणामुळ मला कमी मार्क मिळालेले तुला चालत असतील टर माझा पेपर मीच लिहीन .' आता सत्त्वपरीक्षा माझी होती. महत्त्वाच वर्ष लिहिताना येणारा मानसिक तन, वेळेच बंधन ह्या सगळ्या गोष्टी नजरेसमोर आल्या. पण रोहनच्या इच्छेला, त्याच्या निर्णयाला साथ द्यायची असं ठरवलं.

रोहन आता ख-या अर्थान मोठा झाला होता. ७० टक्के मार्क मिळवून दहावीत गेला. त्याची गणितमाधली आणि संख्याशास्त्रारातली आवड लक्षांत घेऊन त्याने जेव्हा संख्याशास्त्राराची पदवी घ्यायची ठरवले तेव्हा आम्ही त्याच्या या निर्णयाला उत्तेजन दिले. त्याचा हा निर्णय पूर्ण बरोबर होता याची प्रचिती त्याने आम्हाला पहिल्या श्रे णी मध्ये पदवी मिळून दिली . एवढच नाही तर व्यवस्थापन शास्त्राच्या प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळवून त्याने गुणवत्ता यादीत क्रमांक पटकवला. आज लिहिताना अतिशय अभिमान वाटतो कि त्याने हा दोन वर्षाचा अभ्यासक्रम उत्तम रित्या पुर्ण केला . आता त्याला छानपैकी नोकरीसुद्धा मिळाली. आर्थिक दृष्टया , मानसिक दृष्ट्या स्वतंत्र झाला आहे . आज त्याला माझ्या आधाराची गरज भासत नाही. पण ह्या इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर असं लक्षात आल होत कि माझ्यासारखी आणि रोहान्सारखी उदाहरण खूप कमी आहेत. आम्ही भाग्यवान आहेत! कारण रोहनची समस्या माझ्या खूप लवकर लक्षात आली होती. निदान, उपाय ताबडतोब केले गेले होते. तिसर म्हणजे त्याची समस्या सीमारेषेवरची होती. पण दुर्लक्ष झालं असत तर नक्कीच ह्या समस्येन आमच्या सगळ्या घराला ग्रासून टाकल असत. आमच्या 'सन्मान' एपिलेप्सी आधारगट ( मिटींगमध्ये असे अनेक पालक होते, जे सतत त्रासलेले असत, अशा सर्व पालाकानसाठी मी काय करू शकेन असा विचार करत होते. मनात एका कल्पनेन फेर धरला होता.

शीघ्र प्रतिबंधक उपाय ( Early Intervention), निदान होण अत्यंत महत्त्वाच असत. आपल्याकडे माहितीची वानवाच असते. हल्ली इंटरनेट चित्र थोडस बदलल आहे म्हणा. एखाद्या मुलाला एका प्रकारच अपंगत्व उदा. श्रवणदोष असेल त्याच्याबरोबर वाच्दोष, दृष्टीदोष म्हणजेच बहुअपंगत्व (multiple disability) असेल त्या पालकाची ' आम्हा फिरवीशी दहादिशा ' अशीच स्थिती असते. त्यातून एपिलेप्सी किंवा LD सारखी अदृश्य (invisible) समस्या असेल तर पालक समाजाच्या भयाण, दबावान आणि लोकलाजेस्तव ती समस्या शिक्का बसू नये म्हणून दडवतात. शाळा - शाळामधून समुपदेशक (counselor), सा-या होस्पिताल्स्मधून मेडिकल सोशल वर्कर पालकांना प्राथमिक माहिती देऊन मार्गदर्शन करीत आहेत असं दृश्य क्वचितच बघयला मिळत. ही सोयच शाळा- कॉलेज, हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध नाही. त्यामुळ ज्या संस्कारक्षम वयामध्ये सुधार होऊ शकतो ती वर्ष फुकट जातात आणि ब-याच वर्षानंतर चुकीच्या सवयीनी घडलेला, समाजाच्या बाणांनी घायाळ झालेला, बदलाचा प्रतिकार करणार मूल पालकाच्या पदरी असत. अश्वत्थाम्याची भळभळती जखम होऊन जन्मभर वावरत.

'समान' संस्थेत काम करताना, LD असलेल्या मुलांना शिकवताना, बालक- पालकांचे हे अतुलनीय नाते आपल्याला किती बळ देऊ शकत ते मी माझ्यावरून जोखल होतच. पण प्रत्येकाला परिस्थितीची अनुकुलता, मानसिकता असेलच असं नाही पण माहितीची साधन उपलब्ध असली तर पुढच काम बरच सोप जात. माझ्या मनातल्या कल्पनेन जोर धरला. पालकांना संकलित स्वरुपात माहिती मिलन ही अत्यंत निकडीची गरज होती. निदानासाठी डॉक्टर्स, स्पेशल एजुकेटेर्स, शाळा, शेल्डड वर्कशॉप्स यांची सूची मी रातंदिवस खपून तयार केली. ही कल्पना मूर्त स्वरुपात आणण्यासाठी Unity Infraprojects चे पुष्पाताई आणि किशोर अवर्सेकर यांनी फक्त पैशाचाच नाही तर मनाचही पाठबळ पुरवल. आणि ३ डिसेंबर २००१ ह्या जागतिक अपंग दिनी www.childraise.com चा जन्म झाला. ह्या वेबसाईटमधून विभिन्न अपंगत्व, त्याच Rehabilitation - पुनर्वसन, Awareness - जनजागृती, Information- माहिती, support - आधार आणि Education - शिक्षण दिल जात. पालक, सोशल वर्कर, मानसोपचारज्ञ यांनाही ह्या वेबसाईटचा बराच उपयोग होतो आहे. यात विशेष शाळा, निवासी वसतिगृह, पालकांसाठी प्रशिक्षण इ. अनेक गोष्टी आहेत.

प्रत्येक मिडीयाच वेगळ स्थान ओळखून २००४ मध्ये ही सर्व माहिती, प्रेरणादायी कथा इ. पुस्तक रुपात एका रीसोर्स गाईडच्या स्वरुपात 'Journey to Empowerment - a roadmap for special children' या नावाने प्रकाशित केली . अपंगत्वाची ओळख, शिक्षण, व्यवसाय, पुनर्वसन, मनोरंजन, कायदा, एकात्म शिक्षणपद्धती असे टप्पे असलेल हे पुस्तक पालकांना नक्की साथ देत. सध्या हे पुस्तक इंग्रजीत आहे आणि मराठी भाषिक पालकांसाठी लवकरच मराठीतून प्रकाशित करण्याचा मानस आहे.

www.childraise.com , 'जर्नी टू एम्पोवरमेंट नंतर राहिलेली त्रुटी चाईल्डरेझ च्या DISHA - Disability Helpline and Action नंबर 1800 22 1203 ह्या टोल फ्री टेलिफोन सेवेने आणि प्रत्यक्ष भेटीसाठी असलेले आमचे चाईल्डरेझ सेंटर ह्या दोन्हींनी भरून काढली. पालक, शिक्षक, अपंग व्यक्ती, संस्था ह्या सर्वांना आमच्या ह्या सगळ्या सुविधांची झालेली मदत बघून आनंद दाटून येतो.

माझ्या फिटपासून सुरु झालेल्या ह्या प्रवासात वाटेवर मला डॉ. प्रविणा शहा, कित्येक सहकारी ह्यांच्याबरोबर "अपंग नव्हे - मी अभंग" म्हणणा-या प्रसाद घाडी, दिव्या बिजूर यांच्यासारख्या मुलांनी प्रेरणा दिली. LD च्या क्षेत्रात प्रचंड अनुभव असलेले नामवंत प्रो. फालिक यांच्याशी अलीकडेच माझी आणि रोहनची भेट झाली. त्याच वाक्य आम्हा दोघांना नेहमीच प्रेरणा देते-" You both have come a long way. Because of your deficits, you have touched many lives."

आता हा प्रवास फक्त माझा आणि रोहनचा राहिलेला नाही. कवी नारायण सुर्वेंच्या शब्दात सांगायचं झालं तर-'"आज माझ्या वेदनेला अर्थ येत आहे, आणि नव्या सृजनांचे क्षितीज रुंद होत आहे."


कविता शानभाग



 




अपंग कल्याणकारी योजनेसाठी वीस टक्के सेस अनुदान मंजुर

अपंग कल्याणकारी योजनेसाठी 20 टक्के सेस अनुदान मंजुर करण्यात आले आहे. यामध्ये चार लाख रुपये अपंग कल्याणकारी योजनेसाठी मंजुर करण्यात आले आहे.

समाजकल्याण विभागाने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणानुसार अपंगासाठी खास राखीव असलेल्या अनेक योजनांमध्ये जिल्ह्यातील अपंगांना वंचित ठेवण्यात आले आहे. या उमेदवारांना शासकीय निकषाप्रमाणे अनुदान आणि संधी देण्याचे निकष असताना अनेकांना यात डावलण्यात आले आहे. त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या योजनामध्ये समाविष्ठ करण्यासाठी अलीकडेच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील साडेतीन हजार अपंग उमेदवारांचा समावेश आहे.

या योजनांची अंमलबजावणी चालू आर्थिक वर्षात करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सेसमधून 20 टक्के अनुदान मंजुर करण्यात आले आहे. यामध्ये 21 लाख समाजकल्याणासाठी आणि चार लाख रुपये अपंग कल्याण योजनेसाठी मंजुर करण्यात आले आहे.

३ मार्च २०११, सकाळ वृत्तसेवा



 




आता अपंगांसाठी सुलभ वेबसाइट

अपंगांना यापुढे वेबसाइट हाताळण्यासाठी इतर कोणाच्या मदतीची गरज भासणार नाही. अंधांसाठी बोलती, कर्णबधिरांसाठी दृश्य स्वरूपात आणि इतरांसाठी नेहमीप्रमाणे एकाच वेबसाइटचे रूप आता दिसणार आहे. वेबसाइट अपंगांना वापरण्यासही सुलभ व्हाव्यात यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने हे पहिले पाऊल उचलले आहे. मंत्रालयाची http://socialjustice.nic.in/ ही वेबसाइट अपंगांना सहज हाताळता येणार आहे. इतरांबरोबर अपंगांनाही वापरण्यास सुलभ असणारी ही देशातील पहिलीच सरकारी वेबसाइट असणार आहे. यानंतर इतर वेबसाइटदेखील इतरांबरोबर अपंगांनाही सोयीच्या केल्या जाणार आहेत.

कमी दृष्टी किंवा अंध, सेरेब्रल पाल्सी, कर्णदोष असणाऱ्यांना संगणक आणि विशेषत: वेबसाइट हाताळताना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. वेबसाइटवरील मजकूर वाचण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागते. अशा व्यक्तींना सुलभ ठरेल अशी ही वेबसाइट असल्याचा दावा मंत्रालयाने केला आहे. केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या हस्ते या वेबसाइटचे उद्या (ता. 5) उद्घाटन केले जाणार आहे.

दृष्टी कमी किंवा पूर्ण अंधत्व असणाऱ्यांना वेबसाइटवरील मजकूर "स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर'मुळे ऐकता येणार आहे. वेबसाइटवरील मजकूर वाचता येत नसल्याने पुढे अनेक समस्यांना तोंड द्याव्या लागणाऱ्या अंधांना यामुळे स्वत:च ही वेबसाइट "वाचता' येणार आहे. वेबसाइटवरील छायाचित्रे, मथळे, सारांश, तक्ते हे सर्वच याद्वारे ऐकून संबंधितांना काम करता येणार आहे. ज्यांना कर्णदोषामुळे कमी किंवा अजिबात ऐकू येत नाही, अशांना सर्व प्रकारचा मजकूर पाहता येणार आहे. वेबसाइटवरील "ऑडिओ'मधील संवाद किंवा माहितीदेखील संगणकावर पाहता येणार आहे. अशाच प्रकारे सेरेब्रल पाल्सी असणाऱ्यांसाठीदेखील ही वेबसाइट सहजसुलभ करण्यात आली आहे.

वर्षभरापूर्वीच प्रशासकीय सुधारणा विभागाने सरकारी वेबसाइटच्या संदर्भात एक मार्गदर्शकप्रणाली प्रसिद्ध केली होती. त्यानुसार देशाच्या वेबसाइट वापरण्यास सुलभ, जगाच्या पाठीवर कुठूनही वापरता येण्यासारख्या, सुरक्षित असाव्यात आणि अपंगांनादेखील वापरताना त्यात अडथळा येऊ नये अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार "एनआयसी'ने (नॅशनल इन्फोर्मटिक सेंटर) प्रथमच समाजकल्याण मंत्रालयाची ही वेबसाइट तयार केली आहे.

सकाळ वृत्तसेवा



 




अंध प्रवाशांसाठी बेस्टचे पास

गर्दीने भरलेल्या बसमध्ये अंध प्रवाशांना तिकीट विकत घेण्यासाठी येणा-या अडचणी लक्षात घेऊन बेस्टन अशा प्रवाशांसाठी मासिक व त्रैमासिक बस पासची योजना सुरू केली आहे.

बस प्रवासात तिकीट विकत घेताना तसेच सुट्टे पैसे देण्याच्या मुद्द्यावरून ऐन गदीर्मध्ये अंध प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून १४ फेब्रुवारीपासून बेस्ट पासाची योजना सुरु होत आहे. ५५ रुपये किंमतचे मासिक पास व १५५ रुपये त्रैमासिक पासची किंमत असल्याची माहिती बेस्ट समितीचे अध्यक्ष संजय पोतनीस यांनी दिली. उपक्रमाच्या सध्याच्या बसपास वितरण केंदावर हे पास उपलब्ध आहेत. मात्र पास घेण्यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेकडून मिळालेले ओळखपत्र सादर करावे लागेल.

१४ फेब्रुवारी २०११, महाराष्ट्र टाईम्स



 




ऑटिझम म्हणजे नेमकं काय?

ऑटिझम म्हणजे नेमकं काय, हे आपल्याकडे फारच थोड्या लोकांना माहीत असतं आणि ज्या लोकांना 'ऑटिझम'बद्दल थोडीफार माहिती असते त्यांना 'ऑटिस्टिक मुलं' म्हणजे विचित्र पद्धतीनं हातपाय हलवणारी, हसणारी, स्वत:शीच बोलणारी किंवा स्वत:तच मग्न असणारी, किंचाळणारी, रडणारी मुलं अशी काहीतरी कल्पना डोक्यात असते. पण चारचौघांच्या शाळेत जाणाऱ्या, अभ्यासात आणि इतरही उपक्रमांत चमकणाऱ्या 'ऑटिस्टिक मुलां'विषयी क्वचितच कुणी ऐकलेलं असतं. हे असं का व्हावं, याचं कारण फारच साधंसरळ आणि तितकंच विचारात घ्यावंसंही आहे. याचं एक कारण आहे, हे मूल दिसतं आणि वागतं इतकं 'नॉर्मल' मुलासारखं की ते इतर मुलांपेक्षा वेगळं आहे हे कळूनच येत नाही. त्याचं कधीकाळी 'ऑटिझम स्पेक्ट्रम डिस्ऑर्डर'चं निदान झालं होतं हे त्याच्या पालकांनी तुम्हाला सांगितलं तरच तुम्हाला त्याचं वेगळेपण कळू शकतं.

ऑटिझमच्या विकाराचं निदान झालेली अशी कितीतरी मुलं आज सर्वसाधारण शाळांमध्ये शिकताहेत, उत्तम अभ्यास करताहेत आणि जवळपास नॉर्मल आयुष्यही जगताहेत. पण निदानाच्या वेळेस त्यांची स्थिती अशी नव्हती. तेव्हा त्यांच्यात ऑटिझमची सर्व लक्षणे म्हणजे संवादाचा अभाव, सोशल इंटरअॅक्शनची समस्या, वर्तणुकीची समस्या, वैविध्यपूर्ण आवडींचा अभाव, तसंच तीच तीच बिहेवियर्स पुन्हा करण्याची वृत्ती (रिपिटिटिव्ह मॅनरिझम्स) आदी समस्या अस्तित्वात होत्या. मग त्यांच्यात हा एवढा बदल कसा घडून आला? त्याची कारणं- लवकर निदान, थेरपिस्टांच्या मार्गदर्शनाखाली काही वर्षं त्यांच्या पालकांनी घेतलेली अपार मेहनत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मुलांना सर्वसाधारण शाळेत प्रवेश देऊन त्यांच्यावर वेगळी मेहनत घेणाऱ्या शाळांचं आणि शिक्षकांचं अमूल्य योगदान.

ऑटिझम हा मुलांच्या विकासाशी (वाढीशी) संबंधित एक विकार आहे. यात मुलाच्या वेगवेगळ्या क्षमतांची असमान वाढ होते. म्हणजे काही बाबतीत त्याचा विकास वेगाने होतो तर काही बाबतीत विकासाची गती अतिशय धीमी असते. विशेषत: संवादाच्या क्षमतेत फारच गंभीर स्वरुपाच्या अडचणी, वैगुण्यं असू शकतात. सामाजिक संबंध प्रस्थापित करण्यात, मेंदूच्या कामात, ज्ञानेंदियांच्या कामात आणि पर्यायाने वागणुकीत समस्या असतात. ऑटिझमचा विकार का उद्भवतो याची नेमकी कारणे आजही अनेक वर्षांच्या संशोधनातूनही निश्चित झालेली नाहीत. या विकाराच्या तीव्रतेतही कमालीची विविधता आढळून येते. म्हणजे अतिशय तीव्र स्वरुपाच्या ऑटिझमपासून अतिशय कमी तीव्रतेच्या ऑटिझमपर्यंत. पालक सजग असतील तर याची लक्षणे अगदी कमी वयात म्हणजे पहिल्या वर्षातही लक्षात येऊ शकतात.

अगदी लहान वयात थेरपी सुरू झाल्यास, मुलात अभाव असलेल्या क्षमतांचा विकास होऊ लागतो. तसंच या क्षमतांच्या अभावातनं पुढे निर्माण होऊ शकणारे सेकंडरी प्रॉब्लेम्स मग निर्माणच होत नाहीत. संवादाची क्षमता ही यातली सर्वात महत्त्वाची क्षमता. ती जितक्या लवकर विकसित होईल तितके अधिक चांगले.

मुलाच्या नॉर्मल वाढीत मूल बोलू लागण्याच्याही आधी (एक्स्प्रेसिव्ह लँग्वेज) त्याला इतरांची भाषा समजू लागलेली असते. म्हणजे 'रिसेप्टिव्ह लँग्वेज'चा विकास आधी होतो. उदाहरणार्थ, 'बाय बाय' असं म्हणण्याच्या आधी मुलाला 'बाय बाय'चा अर्थ कळू लागतो आणि मूल हात हलवून 'बाय बाय' करते. पण काही ऑटिस्टिक मुले 'इकोलॅलिक' असतात. म्हणजे कानावर पडणारे शब्द ते उच्चारू शकतात. पण याशब्दांचा अर्थ त्यांना अजिबातच कळलेला नसतो! हे म्हणजे आपल्याला न कळणाऱ्या भाषेतले गाणे आपण म्हणू शकतो तसे आहे. अशा मुलाला 'बोलण्या'संदर्भातली काही समस्या आहे हे त्यामुळे पालकांच्या लक्षातच येत नाही.

स्पीच थेरपीने संवादाची मूलभूत क्षमता विकसित होऊ लागल्यावर इतर अतिरिक्त कौशल्यंही या मुलांना प्रयत्नपूर्वक 'शिकवावी' लागतात. ही अतिरिक्त कौशल्यं 'नॉर्मल' मुलांमध्ये आपोआप विकसित होत असतात. ही अतिरिक्त कौशल्यं कोणती?- प्रश्ान् कसे विचारावेत?, मदत कशी मागावी?, काय बोलावं?, कधी बोलावं?, काय बोलू नये?, कधी बोलू नये?, बोलताना किती जवळ उभं राहावं?, नजरेस नजर कशी द्यावी?, हावभावांचा (जेस्चर्स आणि फेशियल एक्स्प्रेशन्स) वापर कसा करावा?

ऑटिझम स्पेक्ट्रमवरच्या मुलांना पुढील विशिष्ट बाबतीत समस्या असते. १. प्रश्ानंची उत्तरं देणं (स्वत:हून उत्तम बोलू शकणारं ऑटिस्टिक मूलही) २. बोलणाऱ्याच्या निव्वळ शब्दांकडे लक्ष न देता त्याला नेमकं काय अभिप्रेत आहे ते समजून घेणं. ३. व्याकरणातील चुका ४. गुंतागुंतीच्या वाक्यांचा अर्थ. ५. एकदम तीन-चार सूचना केल्यास (बेडरूममध्ये जाऊन कपाटातून ड्रॉइंगची वही आणि रंगपेटी आणून तिला दे.) ६. विनोदांचा आणि उपरोधाचा अर्थ समजून घेणं. ७. सामाजिक संदर्भ आणि व्यापक अर्थ समजून घेणं.

काही ऑटिस्टिक मुलांना 'फाइन मोटर डेव्हलपमेंट' (बोटांच्या क्षमतेचा विकास) तसंच 'आय-हँड कोऑडिर्नेशन'ची समस्या असते. या मुलांना लिहिताना वा फळ्यावरून उतरवून घेताना खूप त्रास होतो. काही मुलांना लक्ष केंदित करताना त्रास होतो. ती फार सहज विचलित होतात. नंतर काय घडणार आहे याची कल्पना आधीच न दिल्यास ती डिस्टर्ब होतात. त्यामुळे त्यांना विज्युअल क्लूज देऊन बदलांसाठी तयार करावे लागते.

प्रत्येक ऑटिस्टिक मुलात क्षमता आणि समस्यांची आगळी सरमिसळ असते. असे प्रत्येक मूल सुरुवातीला स्वत:च्या वेगळ्याच पद्धतीने शिकू लागते. या टप्प्यावर थेरपिस्टच्या मदतीने (वन ऑन वन) शिकवण्याची गरज असते. संवादाची क्षमता व समज विकसित झाल्यावर छोट्या गटात हे मूल शिकू शकते. यातूनच इतर अनेक मुलांच्या सोबतीने टिपिकल वर्गात शिकण्यासाठी हे मूल तयार होते. आणखी प्रगती झाल्यावर ही मुले नीट अॅडजस्ट होतात आणि सर्वसाधारण शाळांमध्ये शिकू शकतात.

मात्र, दुदैर्वाने असंख्य ऑटिस्टिक मुलांना आज ही संधीच नाकारली जातेय. 'ऑटिझम' हा शब्द उच्चारताच शाळेचे दार त्यांच्यासाठी बंद होते. यामुळेच पालक मुलाचे 'ऑटिझम'चे निदान शाळेत सांगण्याचे टाळतात. यातून ना शाळेतील शिक्षकांना त्या मुलाला नीट समजून घेता येते. ना त्या मुलाला हवी तिथे अतिरिक्त मदत मिळते. शिक्षकांचाही त्रास यातून वाढतच असतो. ऑटिस्टिक मुलं थोडंसं अधिक लक्ष पुरवलं व मदत केली तर इतर मुलांच्या सोबतीनं शिकू शकतात एवढी साधीशी बाब शिक्षकांनी समजून घेतली तर या परिस्थितीत मोठा बदल घडून येऊ शकेल. 'दर १६० मुलांमध्ये १' इतक्या मोठ्या प्रमाणात आज मुलांमध्ये 'ऑटिझम'ची समस्या आढळत असताना या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. यासंदर्भात सरकारी पातळीवर योग्य दिशेने विचार होण्याची चिन्हे दिसू लागल्याने भविष्यात परिस्थितीत सुधारणा होण्याची आशा आहे.

लेखिका मुंबईस्थित स्पीच थेरपिस्ट - डॉ. शुभांगी औलक, महाराष्ट्र टाईम्स



 




अंधांच्या आयुष्यातील डिजिटल क्रांती

- हर्षद जाधव

'तुम्ही मोबाईल कसा वापरता?' 'तुम्ही कॉम्प्युटर पण चालवता?' ''तुम्ही नेट सर्चिगही करता?'' प्रवासात मोबाईलवर सफाईने फिरणारे आमचे हात पाहून, कॉम्प्युटरविषयीच्या आपसातील गप्पा ऐकून, अनेक सहप्रवाशांच्या मनात आश्चर्य, कुतूहल निर्माण होत असते. बरेचसे विचारावं की नाही या प्रश्नातच अडकून पडतात, काही विचारलं तर आवडेल का? या शंकेत असतात, तर काही धाडसाने वा स्वाभाविक मोकळेपणाने विचारून जातात. खरं तर आश्चर्यापोटी, कुतूहलापोटी वा शंकानिरसनासाठी विचारल्या जाणाऱ्या अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे मी नेहमीच अगदी तत्परतेने आणि प्रवासाच्या वेळेतही शक्य तितक्या विस्ताराने देण्याचा प्रयत्न करीत असतोच. पण हा एकेरी संवाद आमच्या कार्यकुशलतेविषयी काहीएक प्रमाणात जागृती नक्कीच निर्माण करीत असला तरी अजूनही बहुसंख्य समाज आमच्याविषयी मध्ययुगीन मानसिकतेतूनच विचार करीत असलेला आढळून येतो. तथाकथित सुशिक्षित आणि उच्चपदस्थ अधिकारी वर्गाचाही यात समावेश होतो हे विशेष. म्हणूनच, आज जागतिक अंध दिनाच्या निमित्ताने आजच्या या डिजिटल तंत्रज्ञानाने आम्हा अंधांच्या आयुष्यात स्वातंत्र्य, स्वावलंबन आणि स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने काय क्रांती घडवून आणली आहे याविषयी थोडं सांगण्याचा हा एक सार्वत्रिक प्रयत्न.

आजही, माहिती वा ज्ञान संग्रहाची आणि प्रदर्शनाची आपली साधने ही बहुअंशाने दृष्टिगोचरच आहेत. त्यामुळे दृष्टीचाच अभाव असलेल्या आमच्यासारख्यांना आजही हवी ती माहिती किंवा ज्ञान हवं तेव्हा मिळणं व त्यावर आधारित व्यवहार करणं हे सहजशक्य नाही. १६व्या शतकात फ्रान्सचे विचारवंत वॉल्टेयर व डॅनिस डिडेरो यांना अंधांची ही अडचण सर्वप्रथम लक्षात आली. ''अंध व्यक्तींची बुद्धिमत्ता, इतर इंद्रियांची कौशल्ये व कार्यक्षमता ओळखल्या गेल्या पाहिजेत.'' असे विचार वॉल्टेयर यांनी मांडले तर ''दृष्टीअभावी अंधजनांची इतर इंद्रिये अधिक तीक्ष्ण बनत नाहीत तर अंधत्व त्यांना आपल्या उर्वरित इंद्रियांना अधिक प्रयोगशील बनण्यासाठी प्रवृत्त करते. परिणामी, ती नक्कीच कार्यक्षम व कुशल बनतात. त्यामुळे जे काही अंध व्यक्तीकडे आहे त्या आधारे त्याला शिकवले गेले पाहिजे.'' असे मत डिडेरो यांनी मांडले. या विचारांनी प्रभावित होऊन सर व्ॉलेंटाईन हाऊई यांनी १७८४ मध्ये पॅरिस येथे जगातील अंधांसाठीची पहिली शाळा सुरू केली. अंधांना स्पर्शाने वाचता येईल असे उंचवटय़ांच्या अक्षरांचे माध्यम शोधून त्यात पुस्तकंही तयार केली. पुढे लुई ब्रेल यांनी ६ टिंबांच्या स्पर्श लिपीचा शोध लावून अंधांची शिक्षण प्रक्रिया अधिक सुलभ व परिपूर्ण केली. या ब्रेल लिपीचा केवळ पाठय़पुस्तकं वाचन वा शैक्षणिक लेखन एवढय़ापुरताच उपयोग अंधांना झाला नाही तर साक्षर होण्याचे जे जे फायदे तुम्हा लोकांना दैनंदिन व्यवहार करताना होतात त्यापैकी काही फायदे आम्हाला ब्रेल लिपीच्या वापरातून निश्चित मिळू लागले.

ब्रेल लिपीने स्पर्श माध्यमातून ज्ञान माहितीसंग्रह व प्रदर्शनाचा जसा एक नवा पर्याय आम्हाला दिला तसाच पुढे ध्वनिमुद्रण तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर त्या माध्यमातून गायन वादनाप्रमाणेच अभिवाचन करून पुस्तके संग्रहित केली जाऊ शकतात हा शोध लागला आणि माहिती व ज्ञानार्जनाचे स्पर्शाबरोबरच श्रवण हे आणखी एक सशक्त माध्यम आम्हाला मिळाले. विशेषत: उच्च शिक्षणाच्या पातळीवर जिथे ब्रेल लिपीत पुस्तके छापणे हे अधिक खर्चीक बनत जाते तिथे या ध्वनिमुद्रित पुस्तकांचा आम्हाला खूप फायदा होतो. शिवाय अवांतर वाचनाची आवड असलेल्या आमच्यासारख्यांना तर या माध्यमाने बराच अवकाश मिळवून दिला. अर्थात ध्वनिमुद्रिका वा ध्वनिफितींच्या काळात या प्रक्रियेत काही अडचणी निश्चित होत्या. जसे, ऐन परीक्षेच्या काळात रेकॉर्ड घासली जाणे, कॅसेटची रिबीन तुटणे, शिवाय वाचकाने वाचलेले पुस्तक रेकॉर्डिस्टने जसे संकलित केले आहे तसेच ऐकणे क्रमप्राप्त असायचे. आपण जसे एखादे पुस्तक आपल्याला हवे तसे त्यातील पाठ, पान, परिच्छेद, ओळ वा वाक्य स्वतंत्रपणे निवडून तिथे हवा तितका पॉज घेऊन वाचू शकता, त्यावर खुणा करू शकता तसे स्वातंत्र्य या श्रवणप्रक्रियेत नव्हते. पण आता ध्वनिमुद्रण प्रक्रियाही डिजिटलाईज झाल्यानंतर पुस्तकांचे या पद्धतीने ध्वनिमुद्रण संकलन करणे शक्य झाले आहे. डिजिटली एक्सेसेबल इन्फॉर्मेशन सिस्टम अर्थात "ऊअकर" या नव्याने विकसित झालेल्या रेकॉर्डिग फोर्मेटमध्ये उपलब्ध असलेल्या नेविगेशन फिचरमुळे तर या फॉर्मेटमध्ये तयार झालेली पुस्तके आपल्याप्रमाणे आम्हीही अगदी हवी तशी वाचू शकतो. पुस्तकाचे पान, पाठ, परिच्छेद, वाक्य-शब्द शोधणे, त्यावर खुणा करणे हे सगळंच या तंत्रज्ञानामुळे आम्हाला आता सहजसाध्य झाले आहे.

संगणक या युगप्रवर्तक शोधाने तर आमच्या जीवनात विलक्षण क्रांती घडवून आणली आहे. संगणक हाही तसा दृष्टिगोचरच. पण त्यात ध्वनीही तितक्याच सहजपणे संचार करू शकत असल्याचे लक्षात घेऊन या ध्वनिमाध्यमाचा उपयोग करून संशोधकांनी सुरुवातीला काही स्क्रीन रीडर हार्डवेर निर्माण केली. पुढे सॉफ्टवेअरच्या काळात स्क्रीन रीडर सॉफ्टवेअरही तयार केली गेली. ही सॉफ्टवेअर्स संगणकाच्या स्क्रीनवर उमटणारी अक्षरे उच्चारतात, बोलून दाखवतात त्यामुळे आम्ही की-बोर्डवर केलेली कृती बरोबर आहे की अंधांच्या आयुष्यातील जोड नाही हे आम्हाला कळते. अशा प्रकारे बनविल्या गेलेल्या जॉज, ऑर्का एन्विडिए साफा यांसारख्या स्क्रीन रीडर्सच्या आधारे आम्ही संगणकावर लेखन, वाचन, गणित, सीडी बर्निग, इंटरनेटवर सर्चिग, सर्फिग, चॅटिंग, ब्लॉग लेखन आदी दिसण्याची अपरिहार्यता नसलेली सगळी कामे अगदी सहजपणे करू शकतो. केवळ एवढेच नव्हे तर आमच्यातील काहीजण प्रोग्रामिंग, वेब डिझायनिंग शिकून नामांकित खासगी कंपन्यांत नोकऱ्याही करू लागले आहेत. चारुदत्त जाधव हे पूर्णत: अंध गृहस्थ आज टीसीएससारख्या नामांकित कंपनीत कन्सल्टट पदापर्यंतही पोहोचले आहेत. कृष्णकांत माने हा पूर्णत: अंध तरुण आयआयटी मुंबईत फ्री अॅड ओपनसोर्स विभागाच्या विविध प्रकल्पांवर यशस्वीपणे काम करतो आहे. संगणकाने आमच्यासाठी नोकऱ्यांच्या नव्या संधी निर्माण केल्यात हे तर खरंच, पण त्याही आधी लेखन वाचन व्यवहारातील आमचे परावलंबन बहुअंशाने संपवण्याचे खूप मोठे काम संगणकाने केले आहे, म्हणजे अगदी या लेखाचेच घ्या ना, आज मी जॉजचे हिंदी वर्जन वापरून विंडोज एक्सपीमधील एन्स्क्रीप कीबोर्डवर मराठीतून हा लेख लिहून थेट वृत्तपत्राकडे पाठवू शकतो आहे, पण संगणक नसतानाच्या किंवा तो आमच्या आवाक्यात नसतानाच्या काळात हा संपूर्ण लेख मला आदी ब्रेलमध्ये लिहावा लागे. नंतर कुणी लेखनीक गाठून त्याच्या सोयीच्या वेळेप्रमाणे तो मला त्याला डिक्टेक्ट करून देवनागरीत आणावा लागे. इथे ती गरज नाही. म्हणून पण काही वेळा विशेषत: महाविद्यालयीन प्रकल्पाच्या संदर्भात हे देवनागरीतील हस्तलिखित टाइपही करून द्यावे लागे. त्या टायपिस्टने केलेल्या चुका पुन्हा कुण्या वाचकाच्या मदतीने सुधारून घ्याव्या लागत. ही सर्व प्रक्रिया केवळ वेळखाऊच नव्हे तर प्रचंड मनस्ताप देणारी असे. आज संगणकाने त्या कटकटय़ा प्रक्रियेतून आमची सुटका केल्याने भरपूर वाचन आणि भरपूर लेखन करणे आता आम्हाला शक्य झाले आहे. संगणकावर टाइप केलेले, वेबसाइटस्, ब्लॉग्ज वा अन्य डिजिटल माध्यमात उपलब्ध असलेले साहित्य तर या स्क्रीन रीडर्सच्या मदतीने आम्ही वाचतोच, पण डिजिटलाइज न झालेले अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तक किंवा रॉयल्टी हक्काचा प्रश्न नसलेली कोणतीही छापील संहिता आम्ही ऑक्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन अर्थात डउफ च्या माध्यमातून स्कॅन करून डिजिटल फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट करून सहजपणे वाचू शकतो. या सर्वामुळे हवं तेव्हा हवं ते वाचायला मिळण्याची सोय आता हळूहळू निर्माण होऊ लागली आहे आणि माझ्यासारख्या वाचन-लेखनाची विशेष आवड असलेल्यांसाठी संगणकाने दिलेला हा स्वावलंबनाचा आनंद केवळ अवर्णनीय असाच आहे. फक्त तो वाढविण्यासाठी आता पुस्तक प्रकाशकांनीही आपली पुस्तके केवळ दृश्य लिपीतच प्रकाशित न करता ध्वनी किंवा डिजिटल स्वरूपातही उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

संगणकाबरोबरच मोबाईलनेही आमच्या परावलंबित्वाचे प्रमाण बरेच कमी करीत आणले आहे. खरं तर टेलिफोनचा वापर हा तर आमचा हातखंडाच. या टेलिफोनने आम्हाला रोजगाराची संधीही दिली. पण संगणक आणि मोबाईलच्या येण्यानंतर या रोजगारसंधीवर गदाही आली. पण त्याला हे तंत्रज्ञान जबाबदार आहे असे मी म्हणणार नाही, तर ते कुठे, किती व कसे वापरात आणायचे याची अक्कल नसलेले धोरणकर्तेच जबाबदार आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे. असो, तर मोबाईल ही केवळ फोन लावणे व आलेला फोन घेणे एवढय़ापुरती मर्यादित गोष्ट नाही. त्यात फोन नंबर्स नावानिशी सेव करता येणे, नावाच्या आद्याक्षराधारे क्रमांक शोधून वेगात फोन लावणे, एसएमएस करणे, गणिते करणे आता तर नवनव्या तंत्रज्ञानाच्या आधारे एक पॉकेट कॉम्प्युटरसारखाच मोबाईलचा वापर होऊ लागला आहे आणि कॉम्प्युटर जसा आम्ही सहज चालवू शकलो आहोत तसाच टॉक्स स्पीक या खास मोबाईलसाठी बनवल्या गेलेल्या स्क्रीन रीडर्सच्या मदतीने हा मोबाईलही त्याच्या या बहुतेक सर्व सोयीसुविधांस वापरणे आम्हाला सहज शक्य झाले आहे. इथेही टाइप केलेले नंबर्स, अक्षरे, या स्क्रीन रीडर्सच्या आधारे वाचली बोलली जात असल्यामुळे केवळ फोन लावणेच नव्हे तर फोन सेव करणे, हवा तो नंबर शोधणे, एसएमएस करणे, आलेले वाचणे, अगदी संगणकाप्रमाणे नेट वापरणे, ॅढफर सिस्टम वापरणे हे सारेच जमून गेले आहे. आजच्या वेगवान जगासोबत जुळवून घेण्यासाठी आणि स्वत:ची कृतिशीलता वाढविण्यासाठी ही सर्व स्वयंपूर्णता खूप महत्त्वाची आहे.

मात्र सर्वसामान्य अंध व्यक्तीला हे स्वावलंबन मिळविणे काही सहज सोपे नाही. कारण ते अंध व्यक्तीला एकटय़ाने खरेदी करणे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही. संगणक ही काही कागद-पेनाइतकी स्वस्त वस्तू नाही हे तर आपल्यालाही माहीत आहे. पण तो संगणक स्वतंत्रपणे चालवता येण्यासाठीचे जॉजसारखे सर्वात सुस्पष्ट प्रभावी स्क्रीन रीडर ६५००० रुपये किमतीचे आहे. मोबाईलमध्ये वापरले जाणारे स्पीक १२००० तर टॉक्स ४००० रुपये किमतीचे आहे आणि ते वापरण्यासाठीचे मोबाईलही ८००० पेक्षा कमी किमतीत मिळत नाहीत. त्यामुळे अंधांना शिक्षण, रोजगार आणि दैनंदिन व्यवहारात स्वावलंबी करणाऱ्या या सर्व वस्तूंवर शासनाने सबसिडी देऊन त्या वस्तू सर्व गरजू अंधांपर्यंत पोहोचतील याची व्यवस्था केली पाहिजे. पण मी या लेखात सांगितल्यापैकी एखादी तरी गोष्ट आमच्या धोरणकर्त्यांच्या गावी असेलसे वाटत नाही. त्यामुळेच इतकी स्वयंपूर्णता मिळवूनही आम्हाला नोकऱ्या देण्यासंदर्भात आमच्या प्रशासकांची उदासीनता पराकोटीची आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने, शासकीय इच्छाशक्तीने नव्हे, शासनाने चालवलेल्या विशेष अपंग रोजगार भरती मोहिमेत राज्य शासनाने एकाही पूर्णत: अंध व्यक्तीला रोजगार दिला नसल्याचे स्वत: शासनानेच प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयाला सांगितले आहे. आम्ही धडपड करून, मेहनतीने प्रयत्नपूर्वक तंत्रज्ञानाच्या सहकार्याने स्वत:ला शक्य तितके कार्यकुशल बनवतो ते आम्हाला स्वावलंबीपणे स्वाभिमानाने जगता यावे म्हणून, पण हे जगणे आर्थिक आत्मनिर्भरतेखेरीज कसे शक्य आहे?

लोकसत्ता १६ जानेवारी २०११



 




स्पेशल एज्युकेशन

काळाबरोबर स्पेशल एज्युकेशन ही संकल्पना अस्तित्वात आली आहे. जसजशा डिस्लेक्सिया, ए.डी.एच.डी., मूकबधिर यांसारख्या मुलांच्या समस्या उजेडात येऊ लागल्या तसं त्या सोडवण्यासाठी खास शिक्षकांची गरज भासू लागली आहे. स्पेशल एज्युकेटर गतीमंद तसंच शैक्षणिकसमस्या असणा-या मुलांना शिकवण्याचं काम करतात. खरंतर स्पेशल एज्युकेशन ही काळाची गरज आहे. परंतु या क्षेत्राबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे या क्षेत्रात गरज असूनही तिथे वळणाऱ्या लोकांची संख्या मर्यादित आहे. ही दरी कमी करण्यासाठी अनेक बिगर सरकारी संस्था काम करत आहेत.

कामाचं स्वरूप
शैक्षणिक अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त भावनिक आणि वर्तणूक समस्यांनाही तोंड द्यावं लागतं. त्यामुळे स्पेशल एज्युकेटर्स फक्त त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंदित न करता त्यासंदर्भातल्या इतर अनेक समस्या प्रभावीपणे हाताळून शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी होण्यात त्यांना मदत करतात.

गतीमंद मुलांसाठी स्पेशल एज्युकेटर्स-
हे स्पेशल एज्युकेटर्स गतीमंद विद्यार्थ्यांना मूलभूत शैक्षणिक विषय शिकवण्यात मदत करतात. हे स्पेशल एज्युकेटर्स या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या खास शाळांमध्ये किंवा सेंटर्समध्ये किंवा नेहमीच्या शाळांमध्येसुद्धा काम करू शकतात. स्पेशल एज्युकेटर्सना अशा विद्यार्थ्यांबरोबर आर्ट, क्राफ्ट, म्युझिक, ड्रामा इत्यादी माध्यमातून शिक्षण देण्याचं प्रशिक्षण दिलं जातं.

मूकबधिरांसाठी स्पेशल एज्युकेटर्स-
मूकबधिरांसाठी स्पेशल एज्युकेटर्सना खास कला अवगत करावी लागते. त्यांना ओठांच्या हालचाली आणि चेहऱ्यावरचे हावभाव याद्वारे विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्याचं शिक्षण दिलं जाते.

अंध विद्यार्थ्यांसाठी स्पेशल एज्युकेटर्स-
स्पर्श आणि आवाजाच्या आधारे शिकवण्याचं काम हे स्पेशल एज्युकेटर्स करतात. अंध विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीद्वारे शिकवण्याचं कामही हे स्पेशल एज्युकेटर्स करतात.

अपंगांसाठी स्पेशल एज्युकेटर्स-
अनेकदा अपंग विद्यार्थी सर्वसाधारण मुलांबरोबर शाळांमध्ये शिकतात. असे विद्याथीर् काही क्षेत्रातच प्रगती करू शकत नाहीत. उदा- लिहिणं, वाचणं. अशाविद्यार्थ्यांना इतर समांतर वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यक्तींच्या मदतीने हे स्पेशल एज्युकेटर्स मदत करतात.

लर्निंग डिसेबिलिटीसाठी स्पेशल एज्युकेटर्स-
लिहिणं,वाचणं किंवा गणिताशी संबंधित अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर हे स्पेशल एज्युकेटर्स काम करतात. अशा विद्यार्थ्यांची सायकोएज्युकेशनल असेसमेण्ट करून त्यांना त्यांच्या अक्षमता असणाऱ्या क्षेत्रात शिक्षण देण्याचं काम स्पेशल एज्युकेटर्स करतात.

व्यक्तिमत्त्व
या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीकडे चिकाटी हा गुण असणं अत्यंत आवश्यक असतं. तसंच तो मनाने खंबीर असणंही गरजेचं असतं. तो परिपक्वही असावा लागतो.पटकन रागावून किंवा चिडून न जाता समोरच्या व्यक्तीची गरज आणि कमतरता समजून घेऊन शिकवण्याची आवश्यकता असते. आशावादी दृष्टिकोन आणि आनंदी व्यक्तिमत्व असणं या व्यवसायात जरुरी असतं. तसेच उत्तम शारीरिक क्षमता आणि पालकांना जाणून घेण्याची आणि त्यांच्याशी संभाषण करण्याची कला आवश्यक असते.

पात्रता
बारावीनंतर स्पेशल एज्युकेशनमध्ये गॅज्युएशन करता येते. बारावीनंतर पदवी परीक्षा देऊनबी.एड करून स्पेशल एज्युकेशन विषयात एक वर्षाचा कोर्स करता येतो.बारावीसाठी(पीसीबी/पीसीएम)घेऊन स्पीच थेरपी विषयात पदवीधर होता येतं.त्यानंतर बी.एस्सी. डिग्री मिळते. पदवी परीक्षेनंतर कोणत्याही विषयात पदवीधर झाल्यावर स्पेशल एज्युकेशन विषयात डिप्लोमा घेता येतो.

स्पेशल एज्युकेशनचं शिक्षण देणाऱ्या संस्था

  • सोसायटी फॉर द केअर ट्रिटमेण्ट अॅण्ड ट्रेनिंग ऑफ चिल्ड्रन इन नीड ऑफ स्पेशल केअर, मुंबई
  • एस.एन.डी.टी.युनिव्हसिर्टी,चर्चगेट
  • द स्पास्टिक सोसायटी ऑफइंडिया, कुलाबा
  • द सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ टीचर्स ऑफ द डेफ, तिसरा मजला,म्युनिसिपल स्कूल बिल्डिंग,मुंबई
  • व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइण्ड,ताडदेव,मुंबई
  • द हेलन केलर इन्स्टिट्युट फॉर द डेफ अॅण्ड ब्लाइण्ड, नवी मुंबई


महाराष्ट्र टाईम्स - २६ डीसेंबर २०१०



 




अंधांची बॅटिंग

जागतिक अपंग दिनाचं औचित्य साधून थॉमस कूक सेण्टर ऑफ लर्निंग आणि विल्सन कॉलेज-सेण्ट अँड्रू हॉस्टेलच्या वतीने अंध विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. रूईया, एसआयईएस, सेण्ट झेवियर्स आणि विल्सन कॉलेजचे संघ यात सहभागी झाले होते. या स्पधेर्त सेण्ट झेवियर्स कॉलेजचा संघ विजेता ठरला तर रूईया कॉलेजच्या महावीरला मॅन ऑफ दी मॅचचा किताब मिळाला. सेण्ट झेवियर्स सेंटर फॉर व्हिज्युअली चॅलेंज्डचे डायरेक्टर सॅम तारापोरेवाला, व्हॉईस प्रेसिडेण्ट आणि सेंटर ऑफ लनिर्ंगच्या हेड स्मिता गुलवाडी, विल्सन कॉलेजचे व्हॉईस प्रिन्सिपल डॉ. सॅम स्करीया यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसं देण्यात आली. सेण्टर ऑफ लनिर्ंग हे थॉमस कूक (इंडिया) लि.चा एक उपक्रम आहे. हे सेण्टर वेगवेगळे फोरम, इण्डस्ट्री मीट आणि विविध संस्थांच्या मदतीने एज्युकेशन प्रोग्राम करून इण्डस्ट्रीला मार्गदर्शन करतं. या सेण्टरच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सटिर्फाईड कोसेर्स आणि प्रोग्राम्सही आयोजनही करण्यात येतात. हे प्रोग्राम्स ट्रॅव्हल, टूरीझम आणि हॉस्पिटॅलॅटी इण्डस्ट्रीतील आव्हानं पेलताना उपयोगी पडतात. संपर्क : ६६०९१३४७/६५९९१४८२

महाराष्ट्र टाईम्स ९ डिसेंबर २०१०



 




अंधांच्या 'श्वेत काठी'चा सन्मान

अंध बांधवांना पावलोपावली मदत करून आत्मनिर्भर बनण्यासाठी सहकार्य करणारी 'पांढरी काठी' त्यांचा आधारस्तंभ बनली आहे. रस्ता ओलांडताना, लोकल-बस पकडताना, चालताना 'पांढरी काठी' अंधांसाठी मोलाची मदत करते. आयुष्यभर साथ देणाऱ्या या 'पांढऱ्या काठी'बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचा उपयोजित मानसशास्त्र विभाग व नॅब वर्कशॉप फॉर दि ब्लाईंड यांच्या वतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. निमित्त होते 'जागतिक श्वेत काठीदिना'चे.

'नॅब'चे १५ अंध स्वयंसेवक आणि मानसशास्त्र विभागातील ३० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. विद्यापीठाच्या कलिना संकुलातील ग्रंथालय, गरवारे इन्स्टिटय़ूट, पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग, कॅन्टिन या परिसरात विद्यार्थी व शिक्षकांसमोर प्रात्यक्षिके सादर करून 'श्वेत काठी'चे महत्त्व पटवून देण्यात आले. अमेरिकेतील डॉ. रिचर्ड हुवर यांनी १९२० मध्ये 'श्वेत काठी'ची संकल्पना मांडली. या काठीमुळे आम्हाला पावलोपावली मदत होतेच. शिवाय आम्ही इतरांवरील ओझे नसून स्वत:च्या पायावर उभे राहू शकतो, असा संदेश ही काठी देत असल्याचे अंध स्वयंसेवकांनी सांगितले. समानता व सामाजिक न्यायाचे प्रतिक म्हणूनही या काठीकडे पाहिले जाते. रस्त्यावरून जात असलेल्या अंध व्यक्तीच्या हातातील काठी पाहिल्यानंतर त्याला मदत करण्याची किंवा तिच्यासमोरील अडथळे दूर करण्याची भावना समोरच्या लोकांमध्ये निर्माण होते. केवळ काठीच्या आधारे स्वत:ची कामे स्वत: करणाऱ्या अंध बांधवांपासून इतरांना प्रेरणा मिळत असल्याचे मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. गौतम गवळी यांनी यावेळी सांगितले.

पांढऱ्या काठीचा सन्मान करण्याबरोबरच अंधांबद्दल सर्वसामान्यांमध्ये सहानुभूती निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे, असे प्रा. गवळी यांनी 'वृत्तान्त'शी बोलताना सांगितले. अंध व अपंगांच्या समस्यांची जाण विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून 'अपंगांच्या समस्या' हा विषय विविध अभ्यासक्रमांमध्ये सामाविष्ट करण्यात यावा, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता - मुंबई वृत्तान्त १९ ऑक्टोबर २०१०



 




चाईल्डरेझ सादर करीत आहे एपिलेप्सीबद्दल लेख आणि माहिती हिंदी व मराठी मध्ये.

वाचण्यासाठी इथे क्लिक करा.



 




आत्मबलाने अपंगत्वावर मात, अपंगांसाठी विविध करिअर


स्वत: दृष्टिहीन असूनसुद्धा हे अपंगत्व म्हणजे नियतीने केलेला अन्याय आहे, अशी खंत न मानता आत्मबलानेच त्या अपंगत्वावर मात करून व्यावसायिक यश मिळविता येते हे आपल्या कर्तृत्वाने सुहास कर्णिक यांनी सिद्ध केले. जन्मत:च दृष्टिहीन असूनसुद्धा आपल्या शरीरातील अन्य सुप्त शक्तिस्रोतांचा (हिडन इनर सेन्सेस) उपयोग कमालीच्या कौशल्याने आणि मेहनतीने करून आपल्या दृष्टिहीनतेवर मात करून संगीत, गिर्यारोहण, आदी क्षेत्रांत सुहास कर्णिक यांनी कसब प्राप्त केले आहे. बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करणाऱ्या कर्णिक यांनी आपल्या अनुभवाचा फायदा इतर दृष्टिहीन तसेच इतरदृष्टय़ा शारीरिक दोष असणाऱ्यांना मिळावा या दृष्टीने नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड (नॅब) या संस्थेत एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंट अध्यक्ष या पदावर ते कार्यरत आहेत. (संपर्क मो. ०९८२११०९६३२) असेच एक ज्वलंत उदाहरण वयोवृद्ध पंडित विजय संझगिरी यांचे आहे. जन्मत:च दृष्टिहीन असूनसुद्धा आपल्या आईच्या प्रोत्साहनाने पूर्वाश्रमीचे बडोदे येथील व आता मुंबईस्थित पंडित संझगिरी यांनी शास्त्रीय संगीत क्षेत्रात उच्च स्थान मिळविले. इतकेच नव्हे तर उत्कृष्ट संगीतशिक्षक असे स्थान मिळविले.



 




सर्वोच्च न्यायालयाचा अपंगांना दिलासा


रवी प्रकाश गुप्ता हे १०० टक्के दृष्टिहीन असूनही जिद्दीने २००७ मध्ये ते भारतीय प्रशासकीय सेवा (आय.ए.एस.) उत्तीर्ण झाले. मात्र यशस्वी उमेदवारांमध्ये जे अपंग होते त्यांच्या गुणवत्ता यादीत गुप्ता यांची पाचव्या क्रमांकावर निवड होऊनसुद्धा भारत सरकारने त्यांना नेमणूक दिली नाही. अपंगांना समान संधी देऊन त्यांना समाजजीवनाच्या मुख्य प्रवाहात बरोबरीच्या नात्याने आणण्यासाठी केंद्र सरकारने १९९६ पासून लागू केलेल्या 'डिसएबिलिटज' कायद्यामध्ये आयएएसमध्ये अपंगांसाठी पदे सर्वप्रथम २००५ मध्ये निश्चित केली गेली. विशेष म्हणजे प्रशासकीय न्यायाधीकरण (कॅट) पासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत सर्व स्तरांवर ज्येष्ठ सरकारी कायदेतज्ज्ञांसमोर संपूर्ण अंध असलेल्या गुप्ता यांनी स्वत: युक्तिवाद करून लढा दिला. परिणामी सर्वोच्च न्यायालयाने गुप्ता यांचे म्हणणे मान्य करून त्यांना दोन महिन्यांत नियुक्ती द्यावी, असा केंद्र सरकारला आदेश दिला.



 




शैक्षणिक क्षेत्र


अंध विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच व्यावसायिक मार्गदर्शन 'नॅब' म्हणजे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड ही संस्था करते. याविषयी अधिक माहिती nabemp@yahoo.in या ई-मेलद्वारे तसेच सुहास कर्णिक (मो.) ०९८२११०९६३२ यांच्याकडून मिळू शकेल. मूक-बधिर विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी विशिष्ट अभ्यासक्रम ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग येथे उपलब्ध आहेत. (वेबसाइट : www.aiiwww.aiishmysore.com) म्हैसूर, कर्नाटक येथील या संस्थेत १२ वी उत्तीर्ण (विज्ञान) विद्यार्थ्यांपासून ते थेट डॉक्टरेट प्राप्त उच्च पदवीधारकांना हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. (ई-मेल : aiish_academic@yahoo.com ) अपंग विद्यार्थ्यांनी उमेदीने आपले व्यक्तिमत्त्व घडवावे व जीवनात यशस्वी व्हावे या दृष्टीने The spastics society of India, National Job Development Centre, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai-400071 कार्यरत आहे. या संस्थेचे Departments of Evaluation & Assessment/Job Skills Training/ Computer Studies and Training/ Placement Services तसेच The Light Engineering Department असे उपयुक्त प्रशिक्षण उपक्रम आहेत. (वेबसाइट : www.vadesignweps.com/njdc आणि ई-मेल njdc@hotmail.com मंदबुद्धी, अंध, अपंग, मूक-बधिर अशा विद्यार्थ्यांसाठी गुजरात राज्य, समाज सुरक्षा खात्यातर्फे इयत्ता पहिलीपासून शिष्यवृत्त्या देण्यात येतात.



 




माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण


भारतातील चार शाळांमध्ये दृष्टिहीन व्यक्तींना 'ब्रेल कॉम्प्युटर' प्रशिक्षण देण्यात येते. बडोदे येथे मार्च २०१० पासून सेवातीर्थ फाऊंडेशनतर्फे हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. पुरुषोत्तम पांचाळ ज्यांना २००८ साली Best Placement Officer for the Disabled हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ते सेवातीर्थ फाऊंडेशनचे संचालक आहेत. विशेष म्हणजे विशिष्ट तंत्रज्ञान निर्मित हा बोलणारा कॉम्प्युटर असून त्यात रायटर तसेच वैशिष्टय़पूर्ण की बोर्ड आहे. या संगणकावर दृष्टिहीनांसाठी उपयुक्त व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येते. पात्रता दहावी उत्तीर्ण व शुल्क नाही. अंध व्यक्तींना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. आयबीएम, इन्फोसिस, बीपीओ, मेपासिस, सॅप इंडिया आणि आदिती टेक्नॉलॉजी अशा काही कंपन्यांनी अंधांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत १० अंध विद्यार्थ्यांना टेलि कॉलर्स म्हणून नोकरी मिळाली. मूक आणि बधिर व्यक्तींसाठी उपयुक्त मोबाईल एएसएल सेल फोनच्या चाचण्या सध्या अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठात चालू आहेत. व्हिडीओ कॅमेरा असलेल्या मोबाईलला हे उपकरण जोडण्यात येते. अमेरिकन साइन लँग्वेज संबंधित असलेल्या या उपकरणाद्वारे मूक व बधिर दोष असलेल्या व्यक्ती हा मोबाईल व्हिडीओ फोन वापरू शकतील.

देशातील सुमारे एक कोटी २० लाख अधुदृष्टी असलेल्या व्यक्तींसाठी रिलायन्स कम्युनिकेशनतर्फे ऑगस्ट २०१० पासून मोबाईल फोनचे बिल ब्रेल लिपीतून सुरू करण्यात आले आहे. त्यांना मोबाईल फोनसमवेत बिलाची माहितीही मिळावी या दृष्टीने उपलब्ध असलेल्या अशा बिलासाठी अधिक पैसे आकारण्यात येणार नाहीत.



 




आत्मबलाने अपंगात्वावर मात


फोटोग्राफी प्रशिक्षण: पॉलिटिकल सायन्स पदवी अभ्यासक्रमाचा २१ वर्षीय भावेश पटेल हा अंध विद्यार्थी उडत्या कबुतराचे छायाचित्र काढतो. महेश शांतिलाल उमराणीया दृष्टिहीन असूनसुद्धा पोट्र्रेट छायाचित्र काढतो. हे शक्य झाले पार्थो भौमिक यांनी अंध विद्यार्थ्यांसाठी २००६ पासून सुरू केलेल्या 'व्हच्र्युअल स्कूल'मुळे. ८० अंध विद्यार्थी भौमिक यांच्या 'बियाँड साइट फाऊंडेशन'तर्फे छायाचित्र कलेचे प्रशिक्षण घेत आहेत. यामध्ये पोट्र्रेट काढताना संबंधित व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवून तिच्या उंचीचा अंदाज घेणे व मागे जाऊन छायाचित्र काढण्यासाठी अंतर निश्चित करणे, फडफडत उडणाऱ्या कबुतराच्या पंखांच्या आवाजाच्या आधारे त्याचे छायाचित्र शूट करणे, नैसर्गिक सौंदर्याचे छायाचित्रण करताना डोळस व्यक्तीकडून थोडक्यात आजूबाजूचे वर्णन ऐकून व स्वत:च्या श्रवणशक्तीचा वापर करणे. उदा. नदीच्या वाहत्या पाण्याचा आवाज व मध्ये डोंगर किंवा घर असल्यास ध्वनीलहरींच्या अडथळ्याचा अंदाज घेऊन छायाचित्र काढणे. दृष्टी नसूनसुद्धा स्वत:च्या शरीरातील सुप्त अन्य शक्तिस्रोतांचा (हिडन इनर सेन्सेस) तसेच आत्मविश्वास या गोष्टींच्या आधारे ही व्यावसायिक कला शिकविली जाते. या प्रशिक्षणासाठी Voice (seeing with sound.com) या विनामूल्य उपलब्ध असणाऱ्या प्रणालीचा (सॉफ्टवेअर) वापर करण्यात येतो. यामध्ये संबंधित व्यक्तीच्या किंवा निसर्गसौंदर्याच्या छायाचित्रणयोग्य निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरींद्वारे अंध छायाचित्र काढतात. (संपर्क : पार्थो भौमिक, वेबसाइट www.blindwithcameraschool.org)



 




बोलणारी पुस्तके


नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) या संस्थेने उपलब्ध करून दिलेली ऑडिओ बुक्स अंध व्यक्तींसाठी वरदान ठरली आहेत. मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी व अन्य भाषेतील कथा, कादंबऱ्या, चरित्र इत्यादी ललित साहित्य आणि क्रमिक पुस्तके सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच अंध विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी नॅबने उपलब्ध करून दिली आहेत. ही ऑडिओ बुक्स बाहेर विक्रीसाठी नसतात, तर ती फक्त अंध व्यक्तींसाठीच उपलब्ध आहेत. नॅबचे स्वत:चे ऑडियो बुक्सचे ग्रंथालय असून फक्त ग्रंथालय सभासदांना कुरिअरद्वारे ही पुस्तके घरपोच करण्यात येतात. आता सीडी स्वरूपातही ऑडिओ पुस्तके उपलब्ध असून काहीजण आपल्या मोबाइलवरही पुस्तके घेतात आणि ऐकतात. सभासदांसाठी वार्षिक वर्गणी ५० रुपये आहे. (सं. रमणशंकर ०९९२०१५८३७५ किंवा सुहास कर्णिक ०९८२११०९६३२) वर्ल्ड ब्लाइंड युनियनतर्फे भारतात समाजशास्त्र विषयाचे सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई येथील प्राध्यापक तसेच द झेवियर्स सेंटर फॉर द व्हिज्युअली चॅलेंज्ड (XRCVC) या संस्थेचे प्रमुख डॉ. सॅम तारापोरवाला यांनी सहाशेहून अधिक लेखक व प्रकाशक यांच्या साहाय्याने अंध व्यक्तींसाठी एक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे सर्व प्रकाशित पुस्तके ब्रेल लिपीत उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



 




स्पर्शज्ञान आधारित ब्रेल साप्ताहिक


नॅबतर्फे मराठीत स्पर्शज्ञान आणि हिंदी भाषेत वर्तमान ही पाक्षिके चालविण्यात येत आहेत. आता त्यात मराठी भाषेतील नव्या ब्रेल साप्ताहिकाची भर पडली आहे. जानेवारी २०१० पासून सुरू करण्यात आलेले हे २० पानी ब्रेल साप्ताहिक केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतात ब्रेल भाषेतील पहिले साप्ताहिक ठरले आहे. अंध वाचकाकडून या साप्ताहिकाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. राजकारण, क्रीडा, विज्ञान, मनोरंजन, सामाजिक, आरोग्य असे विविघ विषय यात हाताळण्यात येतात व त्याचे संकलन नॅबचे मानद सचिव आनंद आठलेकर करीत आहेत. साप्ताहिकाच्या एका अंकाची किंमत १० रुपये असून वार्षिक वर्गणी ५०० रुपये आहे. (सं. नॅब संचालक रमणशंकर ०९९२०१५८३७५)



 




कायदेविषयक (लिगल) मार्गदर्शन


नोकरी, वैवाहिक अडचणी, वैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी होणारी ओढाताण, आर्थिक पुनर्वसन यासारख्या अनेक समस्यांना दृष्टिहीनांना सामोरे जावे लागते. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नॅबने जानेवारी २०१० पासून 'लिगल एड सेल'ची स्थापन केली. या सेलसाठी उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या अॅड्. प्रीती शहा, अॅड्. जमशेद मिस्त्री, अॅड्. उदय वारुंजकर, सॉलिसीटर कांचन पमनानी या चार वकिलांचे पॅनेल नेमण्यात आले आहे. (संपर्क- सुहास कर्णिक (मो.) ०९८२११०९६३२).



 




अंध विद्यार्थिनीचा शैक्षणिक लढा


कृतिका पुरोहित या अंध विद्यार्थिनीला विज्ञान शाखेत ८९ टक्के गुण मिळाले व फिजिओथेरपी या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी तिने केईएम हॉस्पिटलच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशअर्ज केला. तथापि अंधांना अशा वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जात नसल्याचे कारण दाखवून महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापीठाकडून तिला प्रवेश नाकारण्यात आला. त्या विरोधात कृतिकाने उच्च न्यायालयात आव्हान दिले असता मुख्य न्या. मोहित शहा व न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या खंडपीठाने तिला अभ्यासक्रमासाठी सशर्त प्रवेश देण्यास आणि परीक्षेला बसण्याची मुभा दिली. याशिवाय सरकारी अपंग विभागाच्या आयुक्तांनाही तीन महिन्यांत याबाबत अहवाल देण्याचे आदेश देताना सरकारी यंत्रणेला 'तुमची मानसिकता बदला' असा सल्ला कोर्टाने दिला. कृतिका पुरोहित, रवी प्रकाश, सुहास कर्णिक यांसारख्या 'स्वयंप्रकाशित' कृतिशील व्यक्तींमुळेच केवळ सरकारचीच नव्हे तर समाजाचीसुद्धा शारीरिक दोष असलेल्या व्यक्तींविषयीची मानसिकता बदलते.
लोकसत्ता (बुधवार, ८ सप्टेंबर २०१०)